epranali

This is educational blog.

Res

Breaking news

निबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

सप्टेंबर २२, २०२२

तो देव जाणावा / केल्याने होत आहे रे / प्रयत्नांती परमेश्वर/ उद्योगाचे घरी

  तो देव जाणावा / केल्याने होत आहे रे / प्रयत्नांती परमेश्वर/ उद्योगाचे घरी 






          गळावा घाम अंगीचा यशोदेवी तयासाठी करी घे हार पुष्पांचा - यशवंत 'विद्यार्थ्यांनो, जागृत व्हा' या लेखात डॉ. आंबेडकरही म्हणतात की दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशः प्राप्ती होत असते.

                  अमाने मातीचेही सोने बनते आणि अमावाचून सोन्याचीही माती होते. कारण 'प्रयत्नांती परमेश्वर असतो. म्हणून केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे असे समर्थ म्हणतात. तुकारामांनीही म्हटले आहे, 'असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, "केल्याने होत आहे रे, ' 'उद्योगाचे घरी ऋद्धि-सिद्धि पाणी भरी प्रयत्नांती परमेश्वर या तीनही वचनांचा अर्थ एकच आहे.

       महापुरुषांच्या जीवनात हेच घडले आहे. नेपोलियन म्हणे, 'माझ्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नाही.' 'एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावण्यासाठी नऊ हजारवेळा प्रयोग केले आणि आपल्या अविश्रांत परिश्रमाने आणि चिकाटीने हा प्रयोग सफल करून दाखवला. मादाम क्युरी यांनी रेडिअमचा शोध लावताना असेच अथक प्रयत्न केले. त्यात मृत्यू येण्याची शक्यता असूनही त्यांनी प्रयत्न सोडले नाही. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर मिळालाच मिळाला. न्यूटनचेही उदाहरण लेच सांगते. सतत तीस वर्षे अहोरात्र प्रयत्न करून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत

                    वैज्ञानिकांप्रमाणेच इतरांची उदाहरणे घेता येतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत खडतर परिश्रमातून महाराष्ट्रात स्वराज्याची संस्थापना केली. क्रांतिकारकांपासून तो टिळक गांधीपर्यंत अनेकांनी अविरत कष्ट सोसले, तुरुंगवास सहन केला तेव्हा स्वराज्याची प्राप्ती झाली, महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी लोकांचा छळ सहन करूनही समाजसेवेचे व्रत कायम ठेवले म्हणून आज स्त्रियांच्या शिक्षणाचा एवढा प्रसार दिसतो आहे. डॉ. आंबेडकरांनी दलितांना वर उठवण्याच्या कार्यात केवढेतरी अपार कष्ट सहन केले आहे. त्याने जगापुढे मांडला."

                     साध्या व्यवहारातही आपल्याला हाच अनुभव येतो. काही केलेच नाही तर फळ मिळणार कसे? एक शिक्षक होता. शिक्षक म्हटला, की तो गरीबच असणार, श्रीमंताचे वैभव पाहून त्याला वाटे की असे वैभव आपल्यालाही मिळाले तर काय बहार होईल । त्याने वैभव मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. शिक्षक होता म्हणून पुस्तकांचाच व्यवसाय त्याने पत्करला. स्वतः लिहू लागला. लिहिलेली पुस्तके विकू लागला. शाळा-शाळा हिंडू लागला. आज तो लक्षाधीश आहे. वैभव त्याच्या पायाशी लोळते आहे.

                   धर्मक्षेत्रात येशू ख्रिस्त हा फार मोठा माणूस त्याने खिश्चन धर्म स्थापन केला. जगाला नवा प्रकाश दिला. त्याच्या विचाराच्या प्रभावाने आज संपूर्ण युरोप, अमेरिका आणि इतर खंडही त्याचे अनुयायी बनले आहेत. पण त्याचाही त्याच्या मोठेपणामुळेच जिवंतपणी अतोनात छळ झाला. शेवटी तर त्याला सूळावर चढवून आणि हातापायाला खिळे ठोकून मारण्यात आले पण त्याचे प्रयत्न वाया गेले नाही. आज अर्ध्या जगाने त्याचा ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे.

                  विचारक्षेत्रात सॉक्रेटिस किंवा महात्मा गांधी ह्या फार मोठ्या विभूती होत. त्या मोठ्या होत्या म्हणून त्यांनी आपल्या विचारांनी जगाला बदलून टाकले. एक नवे परिवर्तन दिले. कार्ल मार्क्सही असाच असामान्य विचारवंत होता. त्याने जगाला साम्यवाद दिला. पण यामुळेच सॉक्रेटिसला विष देण्यात आले. महात्मा गांधीला गोळी घालून ठार करण्यात आले. कार्ल मार्क्सला परागंदा व्हावे लागले. पण यापैकी कुणीही प्रयत्न सोडून दिले नाहीत. म्हणून ह्या विभूती व त्यांचे विचार जगमान्य ठरले.

                   जीवनाचे कोणतेही क्षेत्र असो, त्यात यश मिळवायचे असेल तर प्रयत्न केलेच पाहिजेत. नशिबात असेल तसे घडेल हे म्हणणे म्हणजे दैववाद होय. आपण म्हणू तसे घडवून दाखवू हा प्रयत्नवाद आपण स्वीकारला पाहिजे, दैववादाने माणूस कर्तव्यशून्य बनतो, तर प्रयत्नवादाने कर्तृत्वशाली बनतो.

                  दाणे पेरलेच नाही तर फळ मिळणार कसे? एखादे वेळी मात्र माणसाच्या प्रयत्नाला यश मिळत नाही हे खरे आहे. पण त्यामुळे प्रयत्न सोडून देणे चूक ठरते. टिळक-भगतसिंगानी स्वराज्यासाठी प्रयत्न केले. त्यांना स्वराज्य मिळवता आले नाही. म्हणून त्यांचे प्रयत्न वाया गेले असे म्हणता येत नाही. पुढे गांधीजींनी स्वराज्य मिळवले याचे कारण त्यांच्या आधी टिळक भगतसिंगांनी केलेले कार्य होय. कोणताही दगड पहिल्या घणाने फुटत नाही पण तो कच्चा होतो. म्हणून नंतरच्या घणांनी फुटतो म्हणून पहिला घण वाया गेला असे म्हणता येत नाही.

                  प्रयत्न चिकाटीने केले पाहिजेत. फळाची आशा न ठेवता केले पाहिजेत. यश निश्चित येईल. कदाचित उशिरा येईल पण निश्चित येईल. म्हणूनच केल्याने होत आहे कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो आणि ऋद्धि-सिद्धि उद्योगाच्याच घरी पाणी भरतात म्हणून यत्न तो देव जाणावा. संत तुकडोजी महाराजांच्या शब्दात - माणूस बसता, भाग्य झोपते। चालता पुढेच घेई झेप ते प्रयत्नाचेचि रूपांतर होते। भाग्यामाजी निश्चयाने।।

सप्टेंबर २२, २०२२

मराठा तितुका मेळवावा

                          मराठा तितुका मेळवावा



             मराठा हा शब्द जातिवाचकही नाही आणि प्रदेशवाचकही नाही. मराठी बोलणारे ते ते सारे मराठा होत. बंगालमध्ये जा, गुजरातमध्ये जा, पंजाबमध्ये जा, ते लोक तुम्हाला ब्राह्मण, सोनार, माळी असे म्हणणार नाहीत. ते तुम्हाला केवळ मराठा म्हणून ओळखतील. शाहू महाराज मराठा तेवढेच टिळक मराठा, फुले मराठा तेवढेच आंबेडकर मराठा. गुलामनबी आझाद किंवा बॅ. अंतुले मुसलमान नव्हेत, ते मराठा आहेत. अशा सर्व मराठ्यांना एकसंघ करणे आवश्यक आहे. या अर्थाने रामदासांनी 'मराठा तितुका मेळवावा' असे म्हटले. कारण शिवकाळात पराक्रमी मराठे केवळ दुहीमुळे मुसलमानी सत्तेचे गुलाम बनले होते. शिवाजीने इतिहासात प्रथमच या मराठ्यांना संघटित केले व घडवले. 'श्रीशिवछत्रपतींचे कार्य या शेजवलकरांच्या लेखात सांगितल्याप्रमाणे ‘जर कोणाच्या चुकीमुळे, द्रोहामुळे, दुहीमुळे हे राज्य मोडले तर ते पुन्हा उभारू शकतील अशी माणसे त्यांनी तयार केली होती अस्मितेचा, स्वराज्याच्या अभिमानाचा, रुजवून काढलेला माणसांचा ताटवा म्हणजे मराठा तितुका मेळवावा होय. इतर लोकांत सहसा न बौदध्दयोगाला कृति शीलता, त्यागाचा सराव, निलभता, शीलवत्ता, साधेपणा व समत्व या गुणांचा वारसा शिवाजी महाराजांकडून ज्यांना मिळाला ते सारे मराठा होत. त्यांच्या संघटनेची आज गरज आहे. कारण मराठा तितुका मेळवावा.'

                 मराठा सारे एक आहेत म्हणून तेथे अस्पृश्यतेचा प्रश्नच उद्भवत नाही. अस्पृश्य हे आमच्याच हाडामासाचे आहेत असे महात्मा फुले याच अथनि म्हणतात. महर्षी शिंदे यांनी ह्याच कार्यात आपले जीवन वेचले. आगरकर असोत की छत्रपती शाहू असोत, या सर्वांनी या एकसंघतेचा पुरस्कार केला. डॉ. आंबेडकरांनी 'अस्पृश्यता हा आमच्या नरदेहावरील कलंक आहे असे स्पष्टपणे सांगून तो आपल्या रक्ताने धुऊन काढण्याची प्रतिज्ञा केली होती. श्री संत ज्ञानेश्वरही म्हणतात, ‘म्हणौनि कुळे जाती वर्ण। हे आघवे चि गा अकारण । तुकाराम महाराजही सांगतात, 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगल।' आणि तुकडोजी महाराजांनी हा वरच मागितला आहे हा जातिभाव विसरुनिया एक हो अम्ही । अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी। खलनिंदकामनीही 'सत्य-न्याय वसू दे । दे वरचि असा दे।।

                     'मराठा तितुका मेळवावा' यासाठी काही आचारसंहिता पाळावी लागेल. धर्मवाचक किंवा जातिवाचक भेदाभेद तर विसरुनच जावे लागतील पण आर्थिक विषमताही दूर करावी लागेल. नांदोत सुखे गरिब अमिर एकमतानी' असे तुकडोजी महाराज म्हणतात. पण एवढ्याने काही श्रीमंतांचे डोळे उघडत नाहीत किंवा त्यांच्यावर परिणामही होत नाही. तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांनी केला तसाही प्रयोग करावा लागणार आहे. जिवाजीराव शिंदे यांचे संस्थान खालसा होऊन भारतात विलीन झाले होते. त्यामुळे महाराज चिडलेल्या मनःस्थितीत होते. अशावेळी कर्मवीर भाऊराव त्यांच्याकडे गेले आणि त्यांचे राजवाडे व जमीन रयतशिक्षण संस्थेकरिता मागितली. महाराजांना ही गोष्ट संमत झाली नाही. तेव्हा भाऊराव म्हणाले की "आपण जमीन दिलीत तर शाळेतील मुले ती ओसाड जमीन फुलाफळांनी बहरून टाकतील आणि राजवाड्यात भरलेल्या शाळेतून एखादा महादजी शिंदे निर्माण होऊन लोकशाहीच्या जमान्यात दिल्लीच्या तख्तावर बसेल. तरीही आपण राजवाडा व जमीन देणार नसाल तर हे लोक या राजवाड्याच्या तुळ्यांचा व बयांचा उपयोग बेवारशी प्रेत जाळण्यास व घरगुती जळण म्हणून करतील. मग त्यांचे काय चीज होईल?" अशा निर्भयतेने ही क्रांती घडून आणावी लागेल.

                  आजच्या मराठ्यात पहावी तेथे दुही आहे. एक मराठा दुसऱ्या मराठ्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळवतो आहे. आपल्याच आईबहिणीची इज्जत इभ्रत लुटताना त्याला काही लाजशरमही उरलेली नाही हे जळगावचे वासनाकांड सांगत आहे. आदिकसारखा मंत्रीही विमानात बेशरमपणे वागून भावी पिढीपुढील आदर्श पुसून टाकत आहे. सत्तेची एवढी हा की आपल्याच माणसाची राजकीय हत्त्या करुन त्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे समारंभ साजरे होत आहेत. आमचेच पुढारी आमच्या हातावर तुरी देतात आणि जमलेच तर पाठीमागून सुराही भोसकतात. मराठा तितुका मेळवल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही, आणि जिजाये तिकडे माझी भावंडे आहेत सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत याचा प्रत्यय येणार नाही. 

                 आम्हाला ज्ञानेश्वर-तुकारामादी थोर संतांचा वारसा लाभला आहे. शिवाजीची पुण्याई आमच्या पाठीशी आहे. महात्मा फुले ते डॉ. आंबेडकर यांची समाजक्रांतीची दीक्षा आम्हाला मिळालेली आहे. जीजामाता सावित्रीबाई या मातोश्रींच्या मांडीवर आम्ही खेळलो. आहोत. अशा वैभवशाली परंपरेमुळे आमचा अभ्युदय कुणीही अडवू शकत नाही, कारण पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भाविकाळ बोध हाच इतिहासाचा सदा सर्वकाळ पण एकच करणे आवश्यक आहे 'मराठा तितुका मेळवावा'

                    मराठा तितुका मेळवणे म्हणजे महाराष्ट्र शक्तिशाली करणे होय. महाराष्ट्र शक्तिशाली बनला की भारत आपोआप शक्तिशाली बनेल. हिमालय संकटात सापडला की सह्याद्री अपरिहार्यपणे त्याच्याकडे धावून जातो, हा इतिहास आहे. कार्य शक्तीने सिद्ध होते. म्हणून शक्तिशाली महाराष्ट्र ही आपली प्रतिज्ञा असली पाहिजे, आपण 'पराक्रमाचा तमाशा' दाखवलाच पाहिजे.         

                   समाजाच्या उत्कर्षाला जी अनेक प्रकारची धने अवश्य असतात, त्यात मानवधन हे सर्वांत जास्त महत्वाचे आहे. मानधन हेच राष्ट्राचे खरे धन होय. हे धन असल्यावर इतर धने। नसली तरी निर्माण करता येतात किंवा आयात करता येतात. पण हे धन नसेल तर इतर धने असून नसल्यासारखी होतात. तानाजी हा नरदुर्ग नसता तर कोंडाण्याचा सिंहगड झालाच नसता. नरदुर्ग हाच राष्ट्राचा खरा आधार होत. 

                   ' फादर स्टीफन, महानुभाव किंवा ज्ञानेश्वरांसारखे मराठीवर प्रेम करणारे, महात्मा फुले किंवा महर्षी शिंदे यासारखे समतेसाठी जिवाची बाजी लावणारे, शिवाजी किया शाहू महाराजांसारखे लोकसंग्रह करणारे आणि समतेचा ध्वज उंच धरणारे ते सारे मराठे होत. मराठा तितुका मेळवून महाराष्ट्र समर्थ व बलशाली व्हावा आणि त्यांनी गावे - बहु असोत सुंदर संपत्र की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.

सप्टेंबर २२, २०२२

केल्याने देशाटन / प्रवास पाहावा करुन

                केल्याने देशाटन / प्रवास पाहावा करुन         

                               






       

            स्वामी विवेकानंदानी तरुणांना एक मोलाचा संदेश दिला आहे, प्रवास करा, देशाटन करा जगभर फिरा. आपल्या देशाच्या अभ्युदयाचे गुपित देशाटनात दडले आहे. याचे कारण जोवर आपण इतरांची प्रगती पहात नाही तोवर आपल्या अधोगतीचा विचारही आपल्या मनात येणार नाही त्यांच्यासारखे उन्नत होण्याची जिद्द आपल्यात निर्माण होणार नाही, आत्म्याची विशालता आणि राष्ट्राचे वैभवही आपल्याला मिळवता येणार नाही.

                        देशाटन करायचे म्हणजे रेल्वेचा प्रवास आलाच. रेल्वेतला प्रवास माणसाला कितीतरी शहाणपणा देऊन जातो. डब्यात गर्दी असते. आपण आत घुसू पाहतो. डब्यातले लोक आपल्याला आत येऊ देत नाहीत. धक्काबुक्की सुरू होते. जोरात धक्का मारुन आण एखाद्याच्या पायावर आपला पाय देऊन आपण आत शिरतो. गाडी शिटी देते. सिग्नल मान झुकवतो. गाडी चालू लागते, वेग घेते. प्लॅटफॉर्मवर आपल्या माणसांच्या डोळ्यात पाणी आले असते. रुमाल फडफडवून ते निरोप देतात. आत यायला प्रतिकार करणारी माणसे आता आपल्याला त्यांच्यातले समजतात. गप्पागोष्टी करतात. विचारपूस होते. संघर्षाची जागा सहकार्याने घेतली असते. आपण त्यांच्या कुटुंबातलेच एक होऊन जातो. पुढच्या स्टेशनवर आपणही बाहेरच्यांना आत यायला मज्जाव करतो. 'बाहेरच्या' चा आतला झाला म्हणजे माणसात असा अंतर्बाह्य बदल घडून येतो. यावरून एक तत्त्व लक्षात येते की माणसाच्या खऱ्या जाती दोनच, एक आतल्यांची व दुसरी बाहेरच्यांची. मजूर हक्कासाठी कटकटी करतो पण तो मालक बनताच शिस्त व कर्तव्याची भाषा बोलू लागतो. सत्तेविरुद्ध लढणारा पक्ष सत्तारूढ झाला की पूर्वी संप घडवून आणणारा हा पक्ष संप नको म्हणू लागतो, संघर्ष करणारे शांतीवादी बनतात. गो. वि. करंदीकर आपल्या 'आतले आणि बाहेरचें' या लेखात म्हणतात की 'हा आगगाडीतील अनुभव किंवा एखादी मोठी सामाजिक क्रांती या दोन्ही घटना मूलतः एकाच स्वरूपाच्या. दोन्ही कृतींमागील प्रेरणा एकच जागा पहिजे!' मग ती जागा टॉलस्टॉयच्या गोष्टीमधील फक्त सहा फूट असो अगर चर्चिलच्या साम्राज्यस्वप्नातील सहा हजार मैल असो!" 

                             माणूस असे वैश्विक चिंतन करू लागतो. गाडीबाहेर झाडे पळताना दिसतात. दुरून डोंगर साजरे दिसतात. चौकोनी हिरवी शेते आपले लक्ष वेधून घेतात. सुखावह गार वाऱ्याची झुळूक मनाला रोमांचित करते. बा. भ. बोरकरांप्रमाणे आपणही प्रवासात काव्य प्रसवू लागतो. आणि केशवसुतांप्रमाणेच 'क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास' आपणही अनुभवत असतो.

                       अनुपमेय आनंद हा देशाटनाचा दुसरा अपरिहार्य परिणाम होय. सृष्टिदेवीच्या विलक्षण सौदयन आपण थक्क होऊन गेलेलो असतो आणि आपले सारे स्वार्थी विचार, तुच्छ विकार पार गळून पडतात. कन्याकुमारीला जा तेथे समुद्रातच सूर्योदय आणि समुद्रातच सूर्यास्त होतो. सूर्योदय व सूर्यास्त हे दोन्ही काळबिंदू इथे अत्यंत प्रेक्षणीय असतात. जगातील हे एकमेव स्थळ आहे जेथे तीन समुद्रांचे मीलन घडले आहे. येथे पूर्व समुद्रातून चंद्राचा उदय आणि पश्चिम समुद्रात सूर्याचा अस्त एकाच वेळी पाहायला मिळतो. श्रेष्ठ व महान पुरुष आपत्काळी सुद्धा विलक्षण धैयनि वागतो, त्यावेळी त्याच्या मुखावर एक अपूर्व शोभा झळकत असते, तशीच ही सोपा वाटते. अब पहाडावर जा, तेथील सूर्यास्त वेगळाच दिसतो. तेथे नारिंगी, तांबडे, सोनेरी रंग आकाशात मुळीच दिसत नाहीत. सूर्य स्वच्छ पांढन्या रूपेरी रंगाचा दिसतो. हा चंद्र कशावरून नव्हे असा कुणी प्रश्न विचारल्यास त्याला उत्तर देता येत नाही. खंडाळ्याचा घाट पाहा, सह्याद्रीचे डोंगर पहा, परमेश्वर तेथून संदिग्ध भासू लागतो. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. दार्जिलिंगची पहाडराणी पहावी विदेशात जाऊन काप्री बेटावरील देहभान हरवणारी समुद्राची निळाई अनुभवावी.

                        देशाटनाने कलात्मक सौंदर्य पिऊन माणूस तृप्त होतो. वेरुळच्या कैलास लेण्यात शिल्प कौशल्याचा परमोत्कर्ष झाला आहे, तो पाहावा. ताजमहाल पाहून डोळे निववावेत. दौलताबाद किल्याजवळील चांद बोधल्यांची समाधी म्हणजे गुरु मुसलमान व शिष्य हिंदू असे धर्म ऐक्याचे प्रतीक आहे. अशी दृश्ये पाहली की आपले हृदय मातेचे बनून जाते. सारीच तिची लेकरे. हिंदू, मुसलमान, बौद्ध, शीख, ख्रिस्त, पारशी, मद्रासी, बंगाली असे सारे भेद गळून पडतात. 

                       माणूस तेवढा एकच आहे ही अभेद दृष्टी यायला देशाटनासारखा दुसरा उत्तम उपाय नाही. विविध लोकांचा परिचय होतो. त्यातून ज्ञानाची व समजूतदारपणाची देवाणघेवाण होते. एकात्मता हेच अंतिम सत्य याचा साक्षात्कार होतो. देशाचीही बंधने दूर होतात आणि काळाच्याही मर्यादा तुटून जातात. मन विशाल आणि हृदय प्रगल्भ बनते. जपानमधील स्वच्छता आपल्या देशात आणावीशी वाटते. सगळ्या जगाशी आपला ऋणानुबंध जुळतो. जगातील सर्व देशात टिप स्वीकारली जाते पण जपान हा एकमेव देश आहे की जेथे टिप नाकारली जाते. बक्षिसी नाकारुन जपानी माणूस जगातल्या इतर सर्व माणसांहून आपण उंच असल्याचे दाखवून देतो. तेथील गरीब माणूसही सरकारी अनुदान हे भीक समजून नाकारतो आणि भारतात श्रीमंत धेंडेही सरकारी अनुदान मिळवण्यासाठी नाक घासतात. यातून काहीच शिकण्यासारखे नाही काय? कुठे गेला आपला स्वाभिमान? अमेरिकेत जावे तेथील समाजाची धारणा समतेच्या तत्त्वावर झालेली दिसते. तेथे युनिव्हर्सिटीचा माळी युनिव्हर्सिटीच्या प्रेसिडेंटशी बरोबरीच्या नात्याने वागतो. ही समता आपल्याकडे आणता येणार नाही काय? जपान भर कुठल्याही दुकानात भाव वेगळे सापडत नाहीत. कुणी दुकानदार फसवणार नाही. जास्त पैसे दिले तर परत करतील. काळाबाजार अजिबातच नाही. आपल्या देशात हे शक्य होणार नाही काय?

                        देशाटनाने माणूस असा अंतर्मुख होतो. मनुष्याच्या जगातील विषमता, अधमता आणि कुरुपता नष्ट होऊन माणसे फुलपाखरासारखी सुखी, सुंदर आणि स्वतंत्र व्हावीत अशी तळमळ लागते. आणि नामदेवांच्या शब्दात थोडा बदल करुन म्हणावेसे वाटते. परिसाचेनि संगे लोह होय सुवर्ण। तैसे घडे मन देशाटने।।

सप्टेंबर २२, २०२२

शीलं परम् भूषणम्

       शीलं परम् भूषणम्



                   इफ मनी इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट 

शिकवले जाते. डॉ. आंबेडकरही आपल्या 'विद्यार्थ्यांनो जागृत व्हा!' या लेखात म्हणतात की शीलाशिवाय विद्या फुकाची आहे. विद्या असून शील नसेल तर ती माणसे खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करतील. “लबाडी करण्यास चातुर्य व बुद्धी लागते. परंतु चातुर्य व बुद्धी हिला सदाचारांची अर्थात शीलाची जोड मिळाली तर तो लबाडी अथवा फसवाफसवी करू शकणार नाही. आणि म्हणूनच शिकल्यासवरलेल्या लोकांत शीलाची अत्यंत जरुरी आहे. शीलाशिवाय जर शिकलेसवरलेले लोक निपजू लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे. म्हणून प्रत्येक इसमात प्रथम शील असले पाहिजे." वकील किती शिकलेले असतात. म्हणूनच ते खोट्याचे खरे करू शकतात. यातून गुन्हेगारीला उत्तेजन मिळते. 

                    पुराणकाळी एक पुण्यश्लोक राजा होता. तो आपल्याला वरचढ होऊ नये म्हणून इंद्र त्याच्याकडे भिक्षुकाचे रूप घेऊन आला. इंद्राने त्याला भिक्षा मागितली. त्याने रत्ने, माणिक, मोती व सोनेनाणे दिले. पण भिक्षुक इंद्राने त्यातले काहीही घ्यायचे नाकारले. राजा म्हणाला 'भिक्षुका' तुला काय हवे आहे? भिक्षुक म्हणाला, 'मी मागेन ते तुम्ही द्याल असे मला वचन द्या, तरच मला हवे ते मी मागेन.' राजाने वचन दिले. भिक्षुक म्हणाला, 'राजा, मला तुझे शील दे.' राजाने त्याला आपले शील दिले. लगेच एक तेजःपुंज पुरुष राजाच्या शरीरातून बाहेर पडला. त्याच्या तेजाने सारा दरबार थक्क झाला होता. 'तू कोण आहेस?'राजाने विचारले. तो म्हणाला मी तुझे शील आहे. आता मी तुला सोडून चाललो आहे. 'तेवढ्यात आणखी एक सूर्यासारखा दीप्तिमान पुरुष राजाच्या शरीरातून बाहेर आला. राजाने विचारले. कोण आहेस? म्हणाला, 'मी सत्य आहे. जेथे झील जातो तेथेच मोही जात असतो. लगेच राजाच्या शरीरातून चंद्रासारखा शांत प्रकाश असलेला तिसरा पुरुष बाहेर पडला. तो म्हणाला, 'राजा, मी धर्म आहे. सत्यामागून मीही जात असतो.' मग एक विलक्षण भरदार पुरुष राजाच्या शरीरातून बाहेर आला. त्याने राजाला सांगितले की तो विवेक आहे आणि धर्माच्या पाठोपाठ तोही जात असतो. नंतर तलवारीच्या धारेसारखा पाणीदार पुरुष बाहेर पडला. डोळे दिपून जावेत असे त्याचे तेज होते आणि त्याला चार भुजा होत्या. तो म्हणाला, 'मी पुरुषार्थ आहे. विवेक जाईल तेथे मीही जात असतो.' यानंतर सुवर्णकांतीची अत्यंत लावण्यवती स्त्री बाहेर आली. तिने सांगितले, 'राजन' तू आपले शील दिलेस. शीलापाठोपाठ सत्य, धर्म, विवेक, पुरुषार्थ आणि मी लक्ष्मीही जात असते.

                      म्हणून पैसा गेला तर काहीच गमावले नसते आरोग्य गेले तर काहीतरी गमावले असते पण शील गेले तर सारे काही गमावले असते! असे शिकवण्यात येते.

                        शील म्हणजे चारित्र्य, चित्तशुद्धी, संस्कार प्रेम, सहानुभूती, नीतिशीलता इत्यादी सदाचार होत. कल्याणच्या मुसलमान सुभेदाराच्या सुनेला आई म्हणून संबोधणारे छत्रपती शिवाजीमहाराज चारित्र्यसंपन्न म्हणजे शीलवान होते.

                         चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्र हे न खाती सर्प तया .. आवडेल जीवां जीवाचिये परी सकळा अंतरी एक भाव 

असे चित्तशुद्धीचे मर्म सांगणारे तुकोबा शीलवंत होते. गांधीजी शीलवान होते कारण लोकमान्य टिळकांनी गांधीजींच्या चारित्र्याचे मर्म सांगताना म्हटले आहे की 'सत्यावरील व न्यायावरील निष्ठा इतकी तीव्र होती की स्वतःच्या किंवा आपल्या बायकामुलांच्या सुखासुखाचा, बलाबलतेचा विचारही मनात न आणता मनुष्य आपले कर्तव्य करण्यास झटदिशी प्रवृत्त होत. ज्याला मानसिक धैर्य, खरी सत्यनिष्ठा किंवा सात्विक शील आणि दानत म्हणतात ते हेच होय.'

                    पण आज अगदी विपरीत घडले आहे. शील गेले तर काहीच गमावले नाही पण पैसा गेला तर सारे काही गमावले असे दृश्य दिसत आहे. कारण पैशाने शील विकत घेता येते शीलाने पैसा विकत घेता येत नाही असे प्रसंग पदोपदी आढळून येत आहेत.

                     हवालाकांडाने हेच सिद्ध केले आहे ना पैशापायी शिक्षक पेपर फोडतात न्यायाधीशही न्याय फिरवितात. शिरवाडकरांनी याचे मोठे मार्मिक चित्रण केले आहे. ते म्हणतात की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे चुकीचे असून पृथ्वी पैशाभोवती फिरते हेच खरे होय. आज प्रत्येकजण पैशामागे लागलेला आहे. कारण पैसा असेल तर शिक्षणासाठी अॅडमिशन घेता येते, पैसा असेल तरच नोकरी मिळवता येते, पैसा असेल तरच निवडणूक लढता येते, जिंकता येते, पदही मिळवता येते. निष्ठादेखील पैशाने बदलता येते. त्यामुळे आज शील म्हणजे पैसा असे समीकरण होऊ पाहत आहेत व या अर्थाने 'शीलम् परम् भूषणम्' हे तत्त्व अधिकाधिक लोकप्रिय व लोकमान्य होत आहे.

सप्टेंबर २२, २०२२

सत्यमेव जयते

          सत्यमेव जयते



 'केवळ सत्याचाच विजय होतों खरं आहे काय?

                    सत्यवर्तन कशाला म्हणावे यासंबंधीची महान तत्त्वे महात्मा फुल्यांनी 'सार्वजनिक सत्यधर्म मध्ये गुंफली आहेत, ती खरोखरच आदरणीय व आचरणीय आहेत यांत शंका नाही. पण फक्त सत्याचाच विजय होतो असे त्यात कुठेही नमूद नाही.    

                     पौराणिक काळात बळी नावाचा अत्यंत सद्गुणी राजा होऊन गेला. तो इतका पुण्यप्रतापी होता की त्यामुळे इंद्रसिंहासन डळमळीत झाले. आपले इंद्रपद जाणार अशी इंद्राला भीती वाटू लागली. त्याचा सद्गुणांनी व पुण्यकार्याने पराभव करणे इंद्वाला अशक्य होऊन बसले. विष्णू इंद्राच्या मदतीला गेला. बळीराजाकडे जाऊन विष्णूने बटूचे रूप घेऊन बळी राजाला तीन पावलांच्या भूमीचे दान मागितले. बळीराजाने उदारपणे दान दिले. वामनाने एका पावलाने स्वर्ग व्यापला. दुसऱ्या पावलाने पृथ्वी व्यापली. तिसरे पाऊल उपकारकर्त्या बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात घातले. सात्त्विक बळीराजाला कपटाने पाताळात घालणारा वामन देवाचा पाचवा अवतार ठरला, पूजनीय बनला तरीही म्हणायचे सत्यमेव जयते? 

                    कौरव मारले गेले, पण पांडवांचेही सारे पुत्र मारले गेले. कृष्णामुळे परिक्षिती कसाबसा वाचला. त्यालाही पुढे तक्षकाने ठार केले. मरणाहूनही भीषण वेदना उराशी बाळगून पांडव जिवंत राहतात, ह्यालाच म्हणायचे का सत्यमेव जयते?

                    आजचे चित्र तरी काय सांगते? एक पुढारी मंत्रिपदासाठी आपला पक्ष सोडून विरोधकांना जाऊन मिळतो. तेथून पुन्हा आपल्या पक्षात येतो आणि परत मुख्यमंत्री बनतो. त्याने दोन्ही पक्षांचा विश्वासघात केलेला असतो. याउलट जिवाभावाने आपल्या पक्षाची सेवा मनोभावे करणारे तसेच कुजत पडतात. आणि गंमत अशी की त्यांच्याच विरुद्ध पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप केला जातो. दुसरे पक्षही असे की पक्षांतर करणाऱ्यालाच निवडणुकीचे तिकिट देतात आणि निवडून आणतात. प्रामाणिक कार्यकर्त्याला विचारलेही जात नाही. हेच का सत्यमेव जयते? की 'सत्तामेव जयते?

                     राजकारण वारांगनेसारखे असते. म्हणून त्याला सत्यमेव जयते चे ब्रीद लागू पडत नाही असे कुणी म्हणेल. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर तर ठीक आहे, आपण समाजकारणाच्या संदर्भात याचा विचार करू. दररोज नवविवाहिता हुंडाबळी होत आहेत. सासरच्या जाचाला कंटाळून कधी कधी त्या आत्महत्या करतात तर कधी कधी सासरची माणसेच त्यांना पेटवून देतात. शंभरपैकी पाचदहा केसेस कोर्टात येतात. उरलेल्या नव्वद हुंडाबळींचं काय झालं? उमलत्या संसाराची सुखद स्वप्न पाहणारी नवविवाहिता स्वर्गीय स्वप्नांसोबत स्वतःही स्वर्गवासी होते, कोळसा बनून जाते. तिच्या बाबतीत कुठे आहे सत्यमेव जयते ?

                   बलात्काराची प्रकरणे तर याहून भीषण असतात. स्त्रीवर बलात्कार होतो. ती आत्महत्या करते किंवा बलात्कारानंतर गुंड लोक तिला जिवे मारुन टाकतात. जगलीवाचलीच तर सारे आयुष्य तिला अपमानित मनाने व अपराधीपणाने घालवावे लागते. कोर्टात केस केली तर तिच्याच अब्रूचे धिंडवडे निघतात. पती आणि पिताही तिला झिडकारतात. म्हणून अशा केसेस कोर्टाकडे फारशा येतच नाहीत. आल्या तरी पैशाच्या जोरावर पुरावे नष्ट करून बलात्कारी निर्दोष सुटतात. दारूच्या पार्ट्स उडवतात. पुन्हा बलात्काराला मोकळे होतात.

                  वास्तव जीवनाचे प्रतिबिंब सिनेमातही उमटते. कुठलाही सिनेमा घ्या, सत्यमेव जयते पेक्षा सत्तामेव जयतेच अधिक आढळून येईल. याचे कारण वास्तवातही तसेच घडत असते. मला 'आक्रोश' सिनेमा आठवतो. एका विवाहितेवर बलात्कार होतो आणि त्यानंतर तिला मारून टाकण्यात येते. बलात्कारी धनाधीश व सत्ताधीश आहेत. बलात्कार कुणी केला हे गावाला ठाऊक आहे पण कुणीही याबद्दल बोलत नाही. उलट पतीनेच पत्नीचा खून केल्याचा आळ पतीवर घेतला जातो. पती देखील काहीही बोलत नाही, जणू तो मुका झाला आहे. आपण काही बोललो तर हे धनाधीश लोक हालहाल करून आपलाही जीव घेतील याची सर्वांनाच भीती आहे. ही त्यांची भीती खरी आहे कारण एक वार्ताहर जेव्हा त्यांची नावे शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कायमचेच नाहीसे केले जाते. बलात्कारितेचा पती आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना अग्नी द्यायला येतो. त्याला दिसते की आता आपली लहानगी बहीणही तारुण्यात आली आहे. हे क्रूर लांडगे तिचाही आपल्या पत्नीसारखाच घास घेतील याची त्याला जाणीव होताच तिला तो कुऱ्हाडीने मारून टाकतो तिचा कसलाही अपराध नसताना. इथे हा सिनेमा संपतो. यात कुठं सापडतं 'सत्यमेव जयते?' हा एकच नव्हे तर बहुतेक सारे चित्रपट हेच सांगून जातात. प्रतिघात असो, अकेला असो किंवा अत्यंत लोकप्रिय झालेला 'शोले' असो, जेव्हा अनेक चांगल्याचे जीव जातात तेव्हा कुठे एखादा वाईट निकालात निघतो. 

                    खरे की 'सत्यमेव जयते' हे पूर्णपणेच असत्य आहे असेही नाही. येशू ख्रिस्ताला लोकांनी सूळावर चढवले पण मृत्यूनंतर त्याच्याच विचारांचा विजय झाला. " सॉक्रेटिसला सत्यकथनाबद्दल विष देण्यात आले. सत्य दडपले गेले असे वाटले, पण अंती त्याच्याही विचारांचा विजयच झाला. सत्य सूर्यासारखे असते आणि नका बाळांनो डगमगू चंद्र-सूर्यावरील जाई ढगू हेही खरे वाटू लागते. मात्र अनुभावान्ती 'सत्यमेव जयतें' हे अर्धसत्य असल्याचे जाणवते, समाजातले ते वास्तव नव्हे, पण आदर्श आहे.

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

सप्टेंबर ०८, २०२२

शाळेचा निरोप घेताना

         शाळेचा निरोप घेताना 


                  शाळेचा निरोप घेताना माझे डोळे पाण्याने डबडबले होते. या शाळेनेच मला लिहायला-वाचायला शिकवले होते. या शाळेनेच मला 'माणूस बनव होते. या शाळेमुळे लोक मला सुशिक्षित म्हणणार होते. शाळेने मला काय दिले नाही? तिने माझ्या मनात महात्मा फुल्यांच्या समतेच्या विचारांचे बीजारोपण केले. तिने माझ्या हृदयात टिळक सावरकरांच्या राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. तिने मला एकनाथ मह यांच्यासारखे अंत्यजाचे पोर अंगाखांद्यावर खेळवायला लावले. तिने महात्मा गांधीच्या सत्य अहिंसेचा विचार माझ्या अंतःकरणात फुलवला. 

                 ज्ञानेश्वरांच्या काव्याचा दरवळ मी इथेच घेतला. तुकोबाच्या अभंगाचा आस्वादही मी इथेच घेतला. इथेच मी बालकवींच्या निरागस फुलराणीचे स्मितहास्य अनुभवले आणि इथेच मी केशवसुतांच्या तुतारीचा आवाजही ऐकला. शाळेचा निरोप घेताना मला हे सारे सारे आठवले आणि अंतःकरण भडभडून आले. 

                  आमचे गुरुजी मराठीचे सर म्हणजे जणू चालताबोलता ज्ञानकोशच होता. त्यांची चर्या नव्हती तरी त्यांच्याबद्दल आमच्या मनात नेहमी आदरयुक्त भीती वसत होती. त्यांचे बोलणे हळूवार कोमल व रसाळ असले तरी विचार परखड होते. ते नुसते शिकवत नसत तर विद्यार्थ्यांना घडवत असत. कुणी बेशिस्तीने वागला की त्याला चांगला चोप देत असत. पण तसे करतानाही त्याच्याबद्दलचे त्यांचे आंतरिक प्रेम कधीच कमी होत नसे. वरून काटे पण आत 

सप्टेंबर ०८, २०२२

बस स्थानकावर एक तास.

 बस स्थानकावर एक तास.  

 'अनेक भाषा अनेक भाई, अनेक वेशांची नवलाई, परिसंवांची एकच आई एक फुलाच्या विविध पाकळ्या, भेदाचा नच लेश' कुसुमाग्रज याचा जिवंत प्रत्यय जर कुठे येत असेल तर तो बसस्थानकावर. 

             मी बसस्थानकावर बसची वाट पाहत बसलो होतो. प्रवासी येत होते, जात होते. कुठून इतके लोक येतात आणि कुठे जातात हा प्रश्न माझ्या मी घोळवत होतो. कुठली तरी बस स्थानकावर लागताच एकच धांदल सुरू झाली. कंडक्टर तिकिटे देण्यासाठी उभा राहला. वास्तविक लोकांनी रांगेने तिकिट घ्यायला हवे होते. पण तसे न घडता सर्वांनी कंडक्टरला गराडा घातला. एकच गलका सुरू झाला. तशा परिस्थितीतही तो कंडक्टर स्थितप्रज्ञासारखा काम करताना पाहून मला खरोखरीच कौतुक वाटले. नंतर बसमध्ये शिरण्यासाठी दाराशी एकच झुंबड उडाली. त्यामुळे कुणाचे सामान पडत होते तर कुणी स्वतःचा तोल सांभाळता न आल्यामुळे जमिनीवर पडत होते. खांद्यावर मूल असलेल्या बाईचे तर हाल मला पाहवत नव्हते. शेवटी मी जागचा उठलो. त्या मुलाला घेतले. तेव्हा कुठे ती बाई आत शिरू शकली. बसच्या आत जागेसाठी भांडणे सुरूच होती. काही लोकांनी तिकिट न काढता आपले सामान बसच्या आत ठेवले होते. तिकिट काढल्यावर त्यांना जागा मिळाली. पण ज्यांनी आधी तिकिट काढून नंतर बसमध्ये बसण्याचा माणुसकीचा नियम पाळला त्यांना मात्र जागा मिळाली नाही. त्यांना उभ्यानेच प्रवास करावा लागला. कडेवर मूल असलेल्या बाईलादेखील बसण्याकरिता जागा देण्याचे सौजन्य कुणी तरुणाने दाखवले नाही. कंडक्टरची तिकिटविक्री संपताच त्याने बेल दिली आणि आतील प्रवाशांना पोटात घेऊन ती बस चालती झाली. थोडा वेळ स्थानकावर शांतता पसरली. 

                  बसला वेळ असल्यामुळे चहा घेण्यासाठी मी उपहारगृहात गेलो. तेथेही कोलाहल सुरू होता. कोंदट जागेत धूर पसरला होता. कळकट कपड्यातले नोकर चहा, पाणी देत होते. तोंडाने ओरडत होते. माशा घोंघावत होत्या. कसाबसा तो चहा मी घशाखाली ढकलला आणि बाहेर पडलो. 

                मी बुकस्टॉलवर पुस्तके चाळत उभा राहलो. तेवद्यात एका गृहस्थाने समोरच असलेल्या फळांच्या दुकानातून केळी घेतली, खाल्ली आणि केळीचे साल तिथेच टाकून पुढे निघून गेला. त्यावर पाय पडून एक प्रवासी खाली पडता पडता वाचला. कचरा टाकण्यासाठी पेटी असतानाही लोक त्याचा वापर करत नाहीत. हे पाहून खेद वाटला. कधी सुधारणा होणार आपल्यात? 

               मी परत बाकावर येऊन बसलो. तोच एका बसजवळ खूप गर्दी दिसली. गोंधळ ऐकू आला. लोक जोरजोरात ओरडत होते. कुणाला तरी मारत होते. तसाच उठून मी तिकडे धावलो. गर्दीत शिरलो. ज्या मुलाला लोक मारत होते त्या मुलाला मी पहिल्या बसमध्ये चढताना पाहले होते. मग हा परत इथे कसा आला याचे मला नवल वाटले. तो खिसेकापू होता. बसमध्ये गर्दी झाली की तोही बसमध्ये शिरायचा आणि लोकांच्या खिशातले पैसे चोरायचा. म्हणून तो प्रत्येकबसमध्ये चढताना दिसे. यावेळी पैसे चोरत असतानाच लोकांनी त्याला पाहले होते. म्हणून ते त्याला बदडून काढत होते. 

              मुत्रीघराचा वास तर असा होता. तेथील स्वच्छतेसाठी नेमून दिलेला कामगार कधीच जागेवर नसतो. असे कळले. कर्तव्याबाबत आम्ही किती बेफिकीर असतो नाही? यामुळेच जगातले लोक भारताबद्दल म्हणतात, 'भारत म्हणजे पवित्र वचने म्हणणाऱ्या लोकांचा ओंगळवाणा देश यावरुन मला एक गमतीचा संवाद आठवला. एक विचारतो, 'गाव कोणीकडे आहे हे रात्रीच्या वेळी कसं ओळखावं?' दुसरा उत्तर देतो, 'दिव्याचं टिमटिमार्ण दिसलं की समजावं गाव तिकडे आहे.' मग पहिला विचारतो, 'गाव जवळ आलं हे कसं ओळखावं?' दुसरा उत्तर देतो, 'कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला की समजावं, गाव जवळ आलं. पहिला पुन्हा प्रश्न विचारतो, 'आपण नेमकं गावात आलो हे कसं ओळखावं?' दुसरा शांतपणे उत्तर देतो, 'नाकाला फडकं लावावं लागलं की समजावं गावात पोचलो.' शाळेत आम्ही रोज प्रतिज्ञा म्हणत असतो, "भारत माझा देश आहे.' पण ह्याचा आपण थोडातरी विचार करतो काय की जर भारत माझा असेल तर इतका घाणेरडा का? 

                मनातल्या विचारांप्रमाणेच बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढत होती. कोलाहलात आणि गोंगाटातही मन हलवून सोडणारी काही माणुसकीची दृश्ये नजरेला पडत होती. कुणी हिंदू मुस्लिम स्त्रीला आधार देत होता. कुणी मुसलमान हिंदू भिकाऱ्याला मदत करत होता अशा या सगळ्या दृश्यांना टिपताटिपता एक तास सहज निघून गेला. माझी बस आलेली होती. विशेष गर्दी नसल्यामुळे चटकन तिकिट घेऊन मी बसमध्ये शिरलो. खिडकीजवळ बसून बसस्थानकाकडे पाहू लागलो. 

           बसने स्थानक सोडले तसतसे ते माझ्या नजरेपासून दूरदूर होत गेले, आणि मनात उगीचच साध्या संदर्भात तुकोबा डोकावून गेला, 'आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा रामराम घ्यावा

सप्टेंबर ०८, २०२२

आम्हीच अमुचे भाग्यविधाता.

 आम्हीच अमुचे भाग्यविधाता.  

          आम्ही 'नव्या मनूतील नव्या दमाचे शूर शिपाईं आहोत. आमचे भाग्य ब्रह्मदेव लिहित नसतो. आम्हीच अमुचे भाग्यविधाता आहोत. 

            श्रमाने मातीचेही सोने बनते, श्रमावाचून सोन्याचीही माती होते. म्हणून 'केल्याने होत आहे. रे, आधी केलेच पाहिजे' असे समर्थ म्हणतात. तुकारामांनीही म्हटले आहे, 'असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे', 'केल्याने होत आहे रे', 'उद्योगाचे घरी ऋद्धि सिद्धि पाणी भरी' आणि 'प्रयत्नांती परमेश्वर' या तीनही वचनांचा अर्थ एकच आहे, कारण आम्हीच आमचे भाग्यविधाता आहोत. वैयक्तिक जीवनात तर असे अनेक अनुभव येतात. आकाश आणि अनुज हे मित्र होते. आकाश रोज मंदिरात जायचा. अनुज फारसा जात नसे. काय झाले कुणास ठाऊक पण आजकाल आकाशला वाटायचे की पास नापास करणे सगळे देवाच्या हाती असते. परीक्षेच्या दिवशी त्याने देवाचा अंगारा लावला आणि मगच परीक्षेलागेला. उत्तर पत्रिकेवर प्रथम देवाचे नाव लिहिले. अनुजने मात्र यापैकी काहीही केले नाही. त्याने फक्त अभ्यास केला, परीक्षेत आकाश तृतीय श्रेणीत तर अनुज प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता. दगडाच्या देवाने नव्हे तर स्वतःच्या अभ्यासाने अनुजने आपले भाग्य लिहिले होते.

               साध्या व्यवहारातही आपल्याला हाच अनुभव येतो. काही केलेच नाही तर फळ मिळणार कसे? एक शिक्षक होता. शिक्षक म्हटला, की तो गरीबच असणार. श्रीमंतांचे वैभव पाहून त्याला वारे की असे वैभव आपल्यालाही मिळाले तर काय बहार होईल त्याने वैभव मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. शिक्षक होता म्हणून पुस्तकांचाच व्यवसाय त्याने पत्करला. स्वतः लिहू लागला लिहिलेली पुस्तके विकू लागली. शाळा शाळा हिंडू लागला. आज तो लक्षाधीश आहे. वैभव त्याच्या पायाशी लोळते आहे..

              महापुरुषांच्या जीवनात हेच घडले आहे. नेपोलियन म्हणे, 'माझ्या शब्दकोशात अशक्य शब्दच नाही. एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावण्यासाठी नऊ हजारवेळा प्रयोग केले आणि आपल्या परिश्रमाने आणि चिकाटीने हा प्रयोग सफल करून दाखवला. मादाम क्युरी यांनी रेडियमचा शोध लावताना असेच अथक प्रयत्न केले. त्यात मृत्यू येण्याची शक्यता असूनही त्यांनी प्रयत्न सोडले नाही. शेवटी प्रयत्नांनी परमेश्वर मिळालाच मिळाला. न्यूटनचेही उदाहरण हेच सांगते. सतत तीस वर्षे अहोरात्र प्रयत्न करून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्याने जगापुढे मांडला.

              वैज्ञानिकांप्रमाणेच इतरांची उदाहरणे घेता येतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत खडतर परिश्रमातून महाराष्ट्रात स्वराज्याची संस्थापना केली. क्रांतिकारकांपासून तो टिळक गांधीपर्यंत अनेकांनी अविरत कष्ट सोसले तुरुंगवास सहन केला तेव्हा स्वराज्याची प्राप्ती झाली. महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी लोकांचा छळ सहन करूनही समाजसेवेचे व्रत कायम ठेवले म्हणून आज स्त्रियांच्या शिक्षणाचा एवढा प्रसार दिसतो आहे. डॉ. आंबेडकरांगे दलितांना वर उठवण्याच्या कार्यात केवढेतरी अपार कष्ट सहन केले आहेत. 

              जीवनाचे कोणतेही क्षेत्र असो, त्यात यश मिळवायचे असेल तर प्रयत्न केलेच पाहिजेत. नशिबात असेल तसे घडेल हे म्हणणे म्हणजे दैववाद होय. आपण म्हणू तसे घडवून दाखवू प्रयत्नवाद आपण स्वीकारला पाहिजे. दैववादाने माणूस कर्तव्यशून्य बनतो, तर प्रयत्नवादाने कर्तृत्वशाली बनतो. 

             दाणे पेरलेच नाहीत तर फळ मिळणार कसे? एखाद्या वेळी मात्र माणसाच्या प्रयत्नाला यश मिळत नाही हे खरे आहे. पण त्यामुळे प्रयत्न सोडून देणे चूक ठरते. टिळक-भगतसिंगांनी स्वराज्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यादेखत स्वराज्य मिळाले नाही, म्हणून त्यांचे प्रयत्न वाया गेले असे म्हणता येत नाही. गांधींनी मिळवलेल्या स्वराज्याचा पाया म्हणजे टिळक भगतसिंगांचे प्रयत्न होत. 

              जपान जर्मनी ही राष्ट्रे म्हणजे आपले भाग्य घडविणाऱ्या देशांचे ताजे व आदर्श उदाहरण होय. अणुबाँबमुळे दुसऱ्या महायुद्धात जपान बेचिराख झाला होता. पण या गोष्टीला पत्रास वर्षेही लोटली नाहीत तोच जपान फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा उठून उभा झाला आहे आणि औद्योगिक क्षेत्रात संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. याच महायुद्धात उद्ध्वस्त झालेल् आणि शकले पडलेला जर्मनी पुन्हा एकवटला व जगाला भारी झाला. कारण पराभवाने ते खचले नाहीत, आम्हीच अमुचे भाग्यविधाता ही श्रद्धा उरी बाळगून ताठ मानेने जगापुढे आले. कोणताही दगड पहिल्या घणाने फुटत नाही, पण तो कच्चा मात्र होतो व त्यामुळेच नंतरच्या घणांनी फुटतो म्हणून पहिला पण वाया गेला असे म्हणता येत नाही. पण यासाठी प्रयत्न चिकाटीने केले पाहिजेत. फळाची आशा न ठेवता केले पाहिजेत. यश निश्चित येईल. कदाचित उशिरा येईलपण निश्चित येईल. 'केल्याने होत आहे रे' कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो आणि ऋद्धिसिद्धी उद्योगाच्याच घरी पाणी भरतात. ज्याला आपले भाग्य घडवायचे असेल त्याने विराट श्रमसूर्याच्या कक्षी “जाळित यावे, घडवित यावे संहारावे, उभवित यावे स्वतःस उजळित मुक्त फिरावें कारण आम्हीच अमुचे भाग्यविधाता !

सप्टेंबर ०८, २०२२

उन्हाळ्यातील दुपार

 उन्हाळ्यातील दुपार

                    "रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल ह्या आशेवर असह्य संकटाचे आघात सोसणाऱ्या धीरोदात्त माणसांचे प्रतीक म्हणजे उन्हाळ्यातील दुपार होय. 

                   एखाद्या हुकुमशहाप्रमाणे उन्हाळ्यातील दुपारचे ऊन आपल्या टाचेखाली साऱ्यांना चिरडत असते आणि धरित्री त्याचे घाव आपल्या छातीवर झेलत असते. धरित्रीच्या पिकाशी नात सांगणारी माणसं यावेळी तिची विचारपूसही करायला तयार नसतात. ती आपल्या घराच्या दारंखिडक्या बंद करून कूलरच्या थंडाव्यात टी. व्ही. पाहत बसलेले असतात. कधी-कधी आइसक्रीमचा आस्वाद घेतात आणि सरबतासारखे थंड पेय तर असतेच असते.

                   उन्हाळ्यात रॉकेल पेटून एकदम भडकणाऱ्या स्टोव्हप्रमाणे सूर्य उगवतानाच पेटून उठतो. आणि दुपारी तर प्रत्येक जण त्या जुलुमी हुकुमशहापुढे अगतिक झालेला असतो. रस्त्यावरचे नळ कोरडे शुष्क होऊन नुसते तापत राहतात. तारेच्या खांबाची सावलीही केविलवाणी होऊन जाते. दूर गाडीचे एंजीन फाटक्या गळ्याने टाहो फोडत असते. उन्हाने माखलेली क्षितिजे पांढरी फटफटीत दिसतात. माळावर गवताचे चुकार पातेही शिल्लक दिसत नाही. पोळून निघालेली टेकडी एखाद्या पापडासारखी तांबूस करडी दिसते. दृष्टी पडेल तिथे सारे ओसाड व उजाड दिसते, कुठेही काही हिरवे नसते, ओले नसते- सारे तापून निघालेले, सारे जळून गेलेले. सूर्यकिरणांचा सहस्त्र वाद्यांचा चाबूक त्यांना फटकाऱ्यामागून फटकारे मारत असतो. घरे, वाटा, कोळपलेली झाडे सारीच्या सारी मुकाट्याने मार खात उभी राहतात. ते प्रहार तटस्थ स्तब्धतेनं दिले जातात आणि निःशब्द सहनशीलतेनं सोसले जातात. 

                  आणि हे आघात सहन करणारी धरित्री? एकदा ऐन उन्हाळ्यात दुपारी मी दार उघडून बाहेर आलो. दृष्टीच्या सीमेपर्यंत काळी शुष्क जमीन पसरली होती. शब्दांच्या पलीकडे जिचे दारिद्रय गेले आहे अशा स्त्रीच्या अंगावरील फाटक्या चिंध्यांप्रमाणे वाळून कोळ झालेल्या गवताचे अवशेष वाऱ्याने उगीचच भुरभुरत होते. दूरवर नजर फेकली तर मधूनच मृगजळाचे तरंग दिसतहोते. ती काळभोर जमीन त्यामुळे तळल्यासारखी खोलवर हलल्यासारखी वाटत होती. स्तब्धता पसरली होती. धरित्रीच्या जिवाची लाही लाही होत होती. तिचा आला होता. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. जणू विमूढपणे निश्चल तभी होती. सूर्याचा दूत अजून एक स्वामित्व प्रस्थापित विजयोन्मादाने तिच्या हृदयावर नाचत होते. वर निळे अथांग आकाश सरले होते. त्याच्या निळ्या ओलाव्यासाठी तिचा जीव पिपासला होता. आत्यंतिक दुःखाशी धडपडत झगडणारा धैर्यशाली जीव पिपासला होता. आत्यंतिक दुःखाशी धडपडत झगडणारा धैर्यशाली जीव म्हणजे धरित्री, असे मला वाटून गेले. थोडी दूरवर नजर टाकली तो मला एक अद्भुत चमत्कार आढळला. सूर्याच्या दाहक तडाख्यात जिथे सारेच मरगळून पडले होते तिथे तो दूरवरचा एक पिंपळ मात्र लक्षावधं। पानांनी सळसळत होता. ती सारीच्या सारी पाने हिरवीकंच होती. त्यावर विलक्षण लकाकी होती. तान्ह्या मुलाच्या तळव्यासारखी ती पाने नाजूक कोवळी असूनही निखाऱ्यासारखे कडक ऊन सहज पचवून शकत होती. तो पिंपळ रसानं रसरसलेला होता, हिरवेपणानं मुसमुसत होता. याचे कारण ज्या भूमीशी तो निगडित झाला होता त्या भूमीत त्याची बीजे खोलखोल रुजली होती. त्या भूमीचे सारे सत्त्व त्याचे होते आणि ते सत्त्व चिरतारुण्याचे होते, चिरसौंदर्यांचे होते. उन्हात सारे होरपळत असताना एकटाच पिंपळ निर्धारानं हसत उभा होता आणि त्याच्या चिरसौंदर्याचे मर्म मला गवसले होते. ओनिवास कुळकर्णी प्रमाणे आपल्यालाही 'मनातल्या उन्हात उन्हाची विविध रूपे साकार होतात.

                 घराची दारे घट्ट लावलेली, एखाद्या फटीतून येणारा प्रकाशाचा कवडसा, घरात वाळ्याचा सुगंध, विश्रांती घेत असलेली माणसे, बाहेर विजयोन्मादानं तळपणारा डांबरी रस्ता, भेगा पडून आर्त झालेली भूमी, माना मोडून पडलेले वृक्ष, भर उन्हात लग्नातील जेवणावळ ही सारी दृश्ये मनासमोर तळपतात. माध्यान्हीच्या वेळेत समतोलपणाचे स्वारस्य आणि गंभीरतेचा आनंद साठवलेला आहे. तीत उत्शृंखलपणा नाही, भडकपणा नाही. अभिजातपणाला साजेसे सौंदर्य आहे, प्रगल्भ हृदयाप्रमाणे तिची दुःखे निःशब्द आहेत, आणि तिचा आनंदही शांत आहे." म्हणूनच तिच्यातून जीवनरस घेणारा पिंपळवृक्ष चिरतरुण आहे, चिरसौंदर्याचे प्रतीक आहे. तो संदेश देत आहे, "ज्याची पाळेमुळे आपल्या भूमीत खोल खोल रुजतील तोच चिरतरुण होईल, त्याला कुठल्याही तप्त उन्हाचे भय नाही.'

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

सप्टेंबर ०७, २०२२

पावसाळी सहल

        पावसाळी सहल 

  पाऊस आला वारा आला थेंब टपोरे गोरे गोरे भरभर गारा वेचपान लागले नाचू.  

               ह्या शांता शेळके यांच्या काव्यपंक्ती मनात घोळवत घोळवत मी चालू लागलो. भी सहज म्हणून सहलीला निघालो होतो. पावसाळा होता पण मी छत्री, रेनकोट वगैरे काहीही घेतलं नव्हते. कारण पावसानं माझी फसगत केली होती. गेले तीन दिवसापासून रेनकोट घेऊन मी बाहेर पडत असे. दुपारचे ढग येत खूप अंधार होई. पण लवकरच सोसाट्याचा वारा सुटे आणि पावसाचे सारे अवसान कुठल्या कुठे निघून जाई. एकाही थेंबाने न भिजलेला रेनकोट घेऊन रोज परत यावे लागे. आजही मी सहलीला निघालो तेव्हा आभाळात ढग होतेच. पण रोजच्याप्रमाणेच आजही पाऊस येणार नाही याची मला जणू खात्री होती. 

                मी एकटाच सहलीला निघालो होतो. सहलीला जाणे याबद्दल माझ्या काही विशिष्ट कल्पना आहेत. एकतर मी केव्हाही फिरायला जात असतो. फेरफटका मारण्याच्या मजेला वेळेचं बंधन मला मान्य नाही. फिरण्यात संध्याकाळी जशी गंमत असते तशी सकाळीही असते असं माझं मत आहे. तसंच मी व्यायामासाठी सहलीला कधीच जात नाही. धावपळीच्या चालण्यानं व्यायाम होईल पण त्यात फिरण्याची मौज मिळायची नाही. व्यायाम हवा असेल तर फिरण्याची बुद्धी टाकली पाहिजे आणि सहलीला जायचे असेल तर व्यायामाची कल्पना मनात ठेवता कामा नये. माझं आणखीही एक मत असं आहे की चार मित्रांसोबत गप्पा मारत फिरायला जाणं ही देखील खरी सहल नव्हे. अशा फिरण्यात घड गप्पाही होत नाहीत न धड सहलही होत नाही. म्हणून सहलीला मी आपला एकटाच जात असतो. तसंच सहलीला विशिष्ट ठिकाणी जाऊन परतायचं ही कल्पनाही मला चुकीची वाटते. कारण यामुळं त्या ठिकाणी जाऊन पोचणं हे आपल्याला महत्त्वाचं वाटतं. म्हणून आजूबाजूचं सौंदर्य नजरेआड करून आपण तिथं पोचतो. खरं तर सौंदर्याचा आस्वाद घेत घेत रमतगमत जाणं म्हणजे खरी सहल. पावसाळ्यात अशा खऱ्या सहलीचा आनंद उपभोगायला मी एकटाच निघालो होतो.

                 गावाबाहेर आलो. आभाळात ढंग होतेच. पण आता जोराचा वाराही सुटला होता. वाप्यानं पाहता पाहता वादळाचं रूप घेतलं. आडवंतिडवं पळत सुटलेलं वारं माती उडवू लागलं धुकं पडावं तसं सारं अंधारून आलं होतं. वाऱ्यानं उडवलेली धूळ गगनाला जाऊन भिडत होती. ढग गर्जना करू लागले. बघता बघता विजाही चमकू लागल्या. वाऱ्याचा जोर एवढा वाढला की समोर उभं असलेलं एक चिंचेचं जुनं झाड एकसारखं करकरू लागलं. एवढ्यात बीज नागासारखी सळसळली. काळ्या पाटीवर पेन्सिलनं रेघ ओढावी तशी वारा पुन्हा जोरात वाहू लागला. पाऊस वाजत आला आणि मातीचा खरपूस वास दरवळून गेला. पाऊस आडवातिडवा झोडू लागला. पायाखाली पाणी आलं. ते नुसतं साचलं नव्हतं. त्याचे ओहोळ बनले होते. मी त्यातून चालत होतो. त्या वादळी परिस्थितीतही मला अननुभूत असा आनंद वाटायला लागला. . 

                 आतापर्यंत मी कितीतरी पावसाळे पाहले होते, मुसळधार पावसाचे दृश्य तर शेकडो वेळा पाहले होते, पण अशा पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद मी पहिल्यानेच अनुभवत होतो. निसर्गाच्या भव्य व प्रचंड आंदोलनात समरस होण्याचा, एकरूप होण्याचा आनंद केवढा मोठाआहे याची त्या दिवशी मला कल्पना आली. पावसाचा माझ्या चेहऱ्यावर होणारा सपासप मारा मला अतिशय सुखद वाटू लागला. पाण्याच्या अवखळ ओहळातून पाणी तुडवत चालताना मी विलक्षण आनंदाचा अनुभव घेऊ लागलो. आकाशातून सहस्त्र धारांनी वर्षाव होत होता. सारी सृष्टी पाण्याने न्हाऊन निघाली होती. सृष्टीबरोबर मलाही अभ्यंगस्नान घडत होते. आणि त्या चिंब भिजून जाण्यात अननुभूत आनंद वाटत होता. 

               त्यावेळचा प्रत्येक क्षण जीवनाचा अर्थ उलगडून दाखवत होता. चिंचेचे झाड आपले हात उभारून एखाद्या वीराप्रमाणे डोक्यावर वृष्टी झेलत होते. क्षितिजाकडे पाहावे तर दृष्टी धुक्यात बुडून जात होती. झाडे हिरवी, डोंगर श्यामल आणि हवा धूसर तलम होती. गढूळ पाण्यातूनही छोटे खडे उसळत खिदळत पोहत होते. एक पक्षी तर पंख भिजून गेले तरीही अंगे चोरून तिथेच बसून राहला होता. वाहत्या पाण्यावर पडणारे पावसाचे थेंब पाण्यावर वलयांची नक्षी कोरत होते.

                सहल संपल्यावर मी घरी आलो तेव्हा वरून पाण्याने पूर्ण भिजलो होतो आणि आतून विलक्षण प्रसन्नतेने चिंब झालो होतो. मला जणू जीवनाचे मर्मच कळले होते. वाटले, जीविताच्या रस्त्यावरूनही धावतपळत जाण्याऐवजी रमतगमत स्वच्छंदानं सर्व सुंदर वस्तूंचा आस्वाद घेत घेत सहल करावी. मग सुखाचा शोध निराळा करायला नको. त्या पर्जन्यधारांकडे पाहून अचानक महानोरांच्या ओळी ओठावर आल्या.                 ‘ह्या नभाने या भुंईला दान द्यावे आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे.'


सप्टेंबर ०७, २०२२

पहाटेची भ्रमंती.

            पहाटेची भ्रमंती

                  घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी लवकरी वनमाळी उद्याचळी मित्र आला या भूपाळीची स्मृती मनात घोळवणारी पहाट म्हणजे सर्व सौंदर्याची सम्राज्ञी होय.

                 पहाटे भ्रमंती करावी, मन प्रसन्न आणि विचार उत्तुंग असतात. मी पहाटे भ्रमंतीला जातो आणि निरागस आसमंत मला वेड लावतो. वाटतं, अशीच पहाट घरोघरी हसावी. घोटभर पाणी घासभर चारा आणि मायेचा उवारा सर्वांना मिळावा. आभाळ शिवलेले असावे आणि शक्तिशाली हात पाठीवरून फिरावेत. ऊन-पावसातही शरीर गळू नये आणि कुणी लक्तरात राहू नये. पहाटेच्या फुलाप्रमाणे सदाकाळी ओठावर हसू फुलावे. एक तळावर आणि दुसरा माळावर असा विषमतेचा वेगळा संसार नसावा. साऱ्यांच्या पावलाची वाट एकच असावी.

                   कवी मर्ढेकरांना माघ महिन्यातील मुंबईची पहाट वेगळीच जाणवते. पहाटेला भ्रमंती करताना तौही मनामध्ये रेंगाळते. माघ महिन्यात पहाटेच्या वेळी मुंबई बंदराला न्हालेल्या गर्भवतीचे सोज्ज्वळ सौंदर्य आलेले असते. पोटात गर्भ असल्याप्रमाणे आगबोटी बंदरात उभ्या असतात. सचेतनांना नवा हुरूप चढतो, अचेतनांना कोवळा सुगंध येतो. 

             पहाटेपूर्वीच्या काळोखानंतर पहाटेच्या प्रकाशामुळे घरांची डोकी उशीवरून अलगद उचलल्यासारखी वाटतात. पहाटेला हिरवी झाडे न्याहारीसाठी नितळ काळा वायू घेत असतात. समुद्रपक्षी मासे टिपतात तेव्हा जणू सूर्यच मासे वेचत आहे असे वाटते. मुंबई बंदराला जणू निशिगंधाचा सुगंध येत असतो. पहाटेपूर्वीच्या काळोखात सर्व सौंदर्य अदृश्य असते. पहाटेनंतरच्या प्रकाशात सौंदर्य इतके दृश्य होते की त्यातील कोमलता, भावूकता, नजाकताच नाहीशी होते. म्हणून पहाटेची भ्रमंती ही नाजूक, तलम आणि तरल संवेदनांचा आस्वाद देणारी यक्षिणीची कांडी आहे. 

                    पहाटे भ्रमंती करावी आणि सृष्टीसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घ्यावा. दवबिंदू पिऊन टवटवीत झालेली निरागस फुले आपल्याकडे पाहून अशी गोड हसतात की त्यांना पटकन उचलून खांद्यावर घ्यावेसे वाटते. तोच पहाटेचा वारा झाडांच्या कानात कुजबूज करतो आणि ते झाड सळसळ आवाजात फुलांच्या खोड्या सांगतात. वेल नुसतीच मान डोलावत असते. सुंदर रंग परिधान केलेली फुल अंतरंगातही परिमलपूर्ण असतात. अशा एखाद्या फुलाशी फुलाइतके रंगीत फुलपाखरू खेळत बागडत असते. त्यावेळी गवतालाही हिरवेपण येते आणि झऱ्यालाही नाद येतो. पहाटेचा गार वारा लडिवाळ बाळाप्रमाणे अंगाशी झोंबी करतो. त्याने आपल्याशी असेच खेळत राहावे म्हणून तर आपण पहाटेची भ्रमंती करत असतो.

                 दुरून डोंगर साजरे व निळे दिसतात. दूरच्या झाडांच्या आकृती तेवढ्या जाणवतात पण स्पष्ट असे काहीच दिसत नाही. अंधुकतेमुळे उत्कंठा वाढते. आकृती दिसावी पण चेहरा दिसू नये, पक्वानांचा सुगंध यावा पण नेमका पक्वान्न दिसू नये, अशा वेळी जी गोड हुरहूर मनाला लागते तिची भावोत्कट अवस्था पहाटेच्या भ्रमंतीत असते. 

                 पहाट आपले देखणे रूपही वेळोवेळी बदलत असते. उन्हाळ्याची पहाट विरक्त वाटते. या पहाटेचा वारा खूप हवाहवासा वाटतो. आकाश स्वच्छ निळे व निरभ्र असते. शुक्राचा तारा मोठ्या थाटात सिंहासनावर विराजमान झालेला असतो. एकेक तारका नृत्य संपल्यावर पडद्या आड जाणाऱ्या नर्तिकेसारखी वाटते. सूर्योदयापासून पृथ्वीवर प्रचंड जाळ पेटणार असतो. या कल्पनेने आपल्या मनात भवितव्याचे आणि भूतकाळाचेही विचार येतात म्हणून विकार गळून पडतात. म्हणून उन्हाळ्याची पहाट विरक्त वाटते. 

                 पावसाळ्याची पहाट गूढरम्य वाटते. या पहाटेला फिरायला जावे तो पहाटेची प्रभा मेघांनीच पिऊन टाकलेली आढळते. धूसरता सर्वत्र पसरलेली असते. यावेळी पृथ्वीबरोबर मनाचाही दाह शांत झोलेला असतो. मेघाकडे पाहून कधी दयाघनाची स्मृती जागी होते, तर कधी कालिदासाचा मेघदूत गूढगुंजन करतो. 

                हिवाळ्याची पहाट सुवर्णकांतीने विनटलेली विलक्षण मोहमयी जादुगारीण वाटते. या पहाटेत उन्हाळ्याचा दाह नसतो, पावसाळ्याची रहस्यमयता नसते तर असते वास्तवातील राजस समृद्धी. या पहाटेनंतर उन्ह हिरवे होऊन येणार असते. जीवनात तृप्तीचा गंध दरवळणारी हिवाळी पहाट आनंदाचा गौरीशंकर असते. 

              पण पहाट कुठल्याही ऋतूतील असो, पहाट ती पहाटच. पहाटेच्या भ्रमंतीतील आनंद शब्दांपलीकडचा आहे.


सप्टेंबर ०७, २०२२

पहिला पाऊस

             पहिला पाऊस

 येरे येरे पावसा तुला देतो पैसा । पैसा झाला खोटा । पाऊस आला मोठा । ।

               हे पहिल्या पावसाचे बडबडगीत आहे. पहिल्या पावसापूर्वी पृथ्वी आणि मानव सूर्यदाहाने भाजून निघत असतात. पावसाची चातकीय प्रतीक्षा करतात. कालिदासाच्या 'आषाढस्य प्रथम दिवसे' च्या कितीतरी आधीच आभाळ मेघांनी गच्च भरून येते. त्या मेघांचे रंगसौंदर्य मनाला मोहून टाकते. त्यातले कुणी काजळाच्या शिखरासारखे काळे असतात, कुणी इंद्रमण्यांप्रमाणे निळसर असतात, कुणाचे रंग गोकर्णीच्या फुलासारखे निळेजांभळे असतात आणि कुणी प्रकाशातील धुम्रझोताप्रमाणे दिसतात. तेवढ्यात वारा सुटतो आणि मेघातील शुभ्र मोत्यांचा पृथ्वीवर वर्षाव होतो.

                हा पहिला पाऊस मनाला वेडे करतो. पाऊस कोसळत आहे हेच एक अलौकिक असते. मृद्गंध मनालाही सुगंधित करतो. पहिला पाऊस म्हणजे प्रेमळपणाची मूर्तीच ! दृश्य मोठी माणसे खिडकीतून किंवा गॅलरीतून पाऊस अनुभवतात. लहान मुले मात्र धावत धावत अंगणात जातात. पाऊस अंगावर घेतात आणि चिंब होतात. शर्ट घालून भिजण्यापेक्षा शर्ट काढून भिजण्यातच खूप मजा वाटते.

             पहिला पाऊस शहरी माणसांना दिलासा तर शेतकऱ्याला देव वाटतो. आता शहरीयांची काहिली कमी होणार असते. आणि कृषिपुत्र आपली हिरवी स्वप्ने रंगवू लागले असतात. पाखरे गीत गाऊ लागतात. तेंव्हा' अजूनही संदेश देतच असतो.

              कधी पहिलाच पाऊस इतका बरसतो की जमिनीवरून पाणी वाहू लागते. त्यातून कागदी होड्या सोडण्यात क्रिकेटपेक्षाही अधिक सुख वाटते." पहिल्याच पावसाने झाडांची धूळ झटकली जाऊन पाने हिरवी रसरशीत दिसू लागली असतात. माणसाचे मरगळलेले मनही आता टवटवीत झाले असते. 

             पहिल्या पावसाने कवींच्या प्रतिभेला कोंब फुटतो, रुजलेले बीज तरारून वर येऊ पाहते. पहिल्या पावसाने केलेले संस्कार अजून माझ्या मनावर कोरलेले आहेत. पहिल्या पावसाचे रमणीय रूप मी एकदा खंडाळ्याच्या घाटात पाहिले. डोंगरपायथ्याशी कोसळणारा पाऊस, घाटात कोसळणारा पाऊस आणि डोंगराच्या घाटमाथ्यावर स्थिरावलेला पाऊस अशी पावसाची तीन रूपे माझ्या हृदयात ठसली. 

              डोंगरपायथ्याशी कोसळणारा तो पहिला पाऊस हिरव्याकंच पानांतून निथळत होता. तो सतारीवर विद्युतलयीत, मल्हाराची धून गात, इथे तिथे उधळल्यासारखा वाटत होता. घाटात कोसळणारा पाऊस अस्पष्ट व अंधुक दिसत होता. तो आपल्याच तंद्रीत दूरवरची स्वप्नं पाहण्यात गुंग झाल्यासारखा वाटत होता, जणू आषाढयात्रेच्या वाटेवर विसावला होता. डोंगराच्या घाटमाथ्यावर विसावलेला पाऊस निःशब्द होता. तो रोमारोमात पालवणारा, अमर्याद आकाशाला मिठी मारून कोसळणारा आणि सृष्टीप्रमाणे मनातही संजीवन निर्माण करणारा वाटला.

               पहिल्या पावसाचे थेंब किती पिऊ नू किती नाही असं चातक पक्ष्याला वाटतं. पहिल्या पावसानं काळ्या ढेकळाचा मृदुगंध दरवळतो. तो फुलांच्या कळ्याकळ्यात सामावून जातो. काळे डांबरी रस्ते पहिल्याच पावसाने निर्मळ आणि शांत होतात. मृदुगंधाचा आस्वाद घ्यायला दग इकडून तिकडे पळत सुटतात आणि पाखरंही भटकत असतात. ते ओले पक्षी ओल्या पानातल्या रेषा वाचतात. पहिल्याच पावसाने रानेवने आपल्या अंगावरची पोपटी नक्षी मोठ्या दिमाखाने दाखवतात. पहिल्याच पावसाने मनाच्या तापलेल्या तारा हळूहळू शांत होऊ लागतात. 

              पहिला पाऊस मानवी मनात आणि सृष्टीत केवढा विलक्षण चमत्कार करून जातो. पहिल्या पावसाचे तुषार आईच्या दुधाप्रमाणे येतात आणि सारी सृष्टी भुकेजल्या तान्ह्याप्रमाणे ते पीत असते. तुकोबाच्या अभंगाला चिपळ्याची साथ असावी तसे या पहिल्या पावसाच्या गायनाला झुडुपातला रानवारा साथ देत असतो. खोंड हा रानवारा पितो आणि सैरावरा धावतो पण मातीचा सुगंध येताच आपोआप स्तब्ध होतो. लहानग्या बाळाप्रमाणे अवखळ असलेले पक्षी पहिल्या पावसाचे टपोरे थेंब आपल्या पंखावर झेलत असतात. पहिल्या पावसानेच गायीलाही अवेळी पान्हा फुटतो आणि ती आपल्या वासरांना बोलावते. गावदेवीचा कळस भिजतो आणि ती गंमत पाहायला घराच्या छपरावरून अंगणात पागोळ्या येतात. पहिल्या पावसाने धरणी न्हाते आणि अन्नब्रह्माच्या पूजेला बसते. असा हा पहिला पाऊस म्हणजे सृष्टीच्या व मानवी मनाच्या सृजनाचा आरंभ असतो.

सप्टेंबर ०७, २०२२

चांदण्या रात्रीची सहल / चांदण्यातील भ्रमंती.

        चांदण्या रात्रीची सहल /     चांदण्यातील भ्रमंती. 

 माजि अमृतकण कोवळे जैसे शारथिये चंद्रकले तै वेचिती मने मवाळे चकोर नलगे 

अशा तरल आणि हळूवार भाववृत्तींचा अनुभव चांदण्यारात्रीच प्रत्ययाला येतो. 

             "एका मांजराच्या गालामिशावर चांदणे पडले असता ते दूध समजून ते पुन्हा पुन्हा चाटण्याचा मांजराने सपाटा चालवला होता." एका संस्कृत काव्यातले चिमुकले वाक्य, छोटीसीच कल्पना, पण चांदण्याची दुधाळता, रमणीयत्व आणि माधुर्य यातून कसे ओसंडून वाहत आहे. 

             आधी मध्यरात्र म्हणजे कुसुमावती देशपांडे यांच्या शब्दात सौंदर्याची सम्राज्ञी, त्यात चांदण्या रात्रीची मौज तर विलक्षण अमर्याद विशेषतः पौर्णिमेची दुधाळ रात्र मनस्वी मोहमयी असते. 

              म्हणून ती नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेषी प्रेरक ठरते. गेंदेवार गुलाबाप्रमाणे आल्हाददायक असलेल्या पूर्ण चंद्राला पाहून सागराला भरती येते. कवींच्या कल्पनांचेही तरंग आभाळापर्यंत उसळतात. सामान्य माणसाचे मन तृप्त आनंदाने दुथडी भरून वाहते. 

                 चांदण्यात भ्रमंती करावी ती नदीकिनारी, भेडाघाटला नर्मदेचे दृश्य तर या चांदण्यात इतके मनोवेधक असते की कुणाही रसिकाला वेड लागावे, आणि अरसिकानेही रसिक होऊन जावे. नर्मदेची दुग्धधारा शारदीय पौर्णिमेच्या आधीच रूपेरी झालर पांघरते. काळ्याकभिन्न पर्वताच्या कड्यावरून खाली वेगाने सांडणारा फेस अंगावर तुषार उडवतो आणि आपण रोमांचित होतो, मन मोहरून जाते. त्या चांदण्यारात्री नावेत बसावे, नाव पाण्यात ढकलून द्यावी जलप्रवाहाबरोबर आपणही भरकन जावे खाली पाण्यात पूर्ण चंद्राचे प्रतिबिंब डोलत असलेले आणि वर आभाळात सारे काही चंदेरी भवलतेने विनटलेले. आभाळाच्या निळ्या शालूवर ही चांदण्यांची भरतारी जर किती खुलून दिसते.

                 चांदण्यारात्रीच्या भ्रमंतीत सोबत मित्रपरिवार असावा, साऱ्यांचेच मन स्वच्छंद आणि भावना मोकळ्या असतात. अंतःकरणात उर्मी उसळतात, तरंग मनावर तरंगतात. रस्त्याची डांबरी नागीणही मंत्रमुग्ध करते, विलक्षण मोहिनी घालते. तिच्यासोबत आपण किती दूरवर निघून गेलो याचे भानही राहत नाही. चांदण्याच्या सुखद मुलायम रेशमी स्पर्शाने तर एक अनामिक हुरहूर जीवाला क्रांत आणि तृप्तही करते. चांदण्यात पायी चालताना पायाखाली मऊमऊ थंडगार धूळ तुडविल्याचा आनंद वाटतो चांदण्यात उडलेली धूळ ही डोळ्यांनी अनुभवण्याचा सौदर्यविलास आहे. 

               गरिबांच्या घरी गालिचे कुठले? पण चांदण्यारात्री झाडाखाली निसर्ग गरीब-श्रीमंत असा भेद न करता चांदण्याचे गालिचे सर्वासाठी पसरतो. झाडाची पाने हलू लागतात तेव्हा जमिनीवरचे हे गालिचे सळसळतात, अचेतनातही चैतन्याचा साक्षात्कार देतात. नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करतात चांदणी रात्र आपल्या मनात भावभक्तींची फुलं फुलवून जाते. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र अधिकच रमणीय वाटतो. तो समानधर्मी दुधाशी एकरूप होतो.ते चांदणे इतके मधुर असते की दुधात ते अमृत घालते असा लोकसमज रूढ झाला आहे. अशा चांदण्याने नटून सजून आलेली सृष्टी मेनका, रंभा, उर्वशी किंवा कुठल्याही अप्सरेपेक्षा सुंदर वाटावी. सरोवराचे शुभ्र कर्णफुल कानात घातलेली, हंसासमान धवल वर्णाची, धूसर पांढरे वस्त्र परिधान केलेली अशी ही निरागस सृष्टी बालिका हसतमुखाने आपल्या पुढ्यात उभी आहे असे चांदण्यारात्रीतील सृष्टीला पाहून मनाला भावत असते. 

                 आपल्या अंतरातील भावनाही चांदण्यात आवेगी आणि कोमल झालेल्या असतात. हळुवारपणाचे उदाहरण देताना श्रीज्ञानेश्वरदेखील शारदीय पौर्णिमेच्या चांदण्याचाच आधार 

                अशाच एका दुधाळ रात्री आम्ही रामटेकला रामगडावर गेलो होतो. मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. लक्ष्मणाचे दर्शन घेतले. गडावर किंवा नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ अर्पण करताना चांदणी रात्र आपल्या मनात भक्तीची फुलं फुलवून जाते. डोंगरावरुन सभोवार नजर टाकली. किती सुंदर दृश्य होतं ते टेकडीवरून गार वारा वाहत होता. वाऱ्याची झुळूक मनाला उल्हसित करत होती.

               नंतर गड उतरून आम्ही रामसागरावर गेलो. हा एक मोठा तलाव, एक नितांतरमणीय सरोवर आहे. त्यात चंद्राचे आणि चांदण्याचे प्रतिबिंब पडले होते. पाण्यावर लहरी उठत होत्या. चांदण्याच्या चंदेरी प्रकाशात त्या लहरी बांदीप्रमाणे चमकत होत्या. आम्हाला वाटले, पांढरे शुभ मासेच लाटांवर तरंगत आहेत, पोहत आहेत. 

              काठावर बसलेल्या नावाड्याला आम्ही विनंती केली. त्यानं थोडेसे पैसे घेऊन आम्हाला नावेत बसवले. रामसागरात फिरवून आणले. तो आनंद अनिर्वचनीय होता. कुणी पाण्यात हात बुडवत होते, कुणी पाय बुडवत होते, कुणी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते. 

            शीतल चांदणे मनाला वेड लावते हेच खरे।

सप्टेंबर ०७, २०२२

जगण्यातील / जीवनातील आनंद

 जगण्यातील / जीवनातील आनंद



 'जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडें “आनंदाचे डोही आनंदी तरंग'

 जगण्यातली मौज कोणत्याही ऋतूत आणि कुठल्याही वयात अनुभवता येते. उन्हाळा आला की थंडगार सरबताचे पेले डोळ्यापुढे दिसू लागतात. घरात वाळ्याच्या ताट्या किंवा कूलर यांची थंड हवा खेळत आहे. परीक्षांचा जाच संपला आहे. आंब्याच्या रसाची मेजवानी झडली आहे. मन आनंदाने भरून गेले आहे. जगण्यात खरोखरच मौज आहे. 

               पावसाळा म्हणजे तर प्रेमळपणाची मूर्तीच रिमझिम पाऊस पडतो आहे. अंगावर रोमांच उभे राहले आहेत. रपरप पडणारी पावसाची सर निघून गेली आहे. अशावेळी मनसोक्त भटकायला आपण एखाद्या टेकडीकडे निघालो आहोत. टेकडी चढून माथ्यावर पहुडलो आहोत. मनातले सारे विचार विकार गळून पडतात. केवळ आनंदाची प्रचिती येते. 

            हिवाळा म्हटला की हुरड्याची आठवण येते. थंड वाऱ्याचा शरीराला सुखद स्पर्श होत असतो. हुरडा खायला आपण शेतावर गेलो असतो. शेकोटी पेटवून हुरडा भाजला जात असतो. शेतात जिकडे तिकडे पिवळे सोने उगवले असते. त्यापुढे सोन्याचे अलंकार तुच्छ वाटतात. मिडास राजाने हे सोने पाहले असते तर 'मी हात लावीन त्याचे सोने व्हावे असा वर मागितलाच नसता.

              पहाट फुटते. कोंबडा आरवतो. सृष्टी जागी होते. आतापर्यंत शांत असलेल्या जगात चैतन्य खेळू लागते. पहाटेचा मंद वारा विलक्षण सुखाचा अनुभव देतो. खरोखरच जगण्यात मौज आहे. खूप मजा आहे.

             दुपारी पुरुष आपापल्या कामावर जातात. कुणी शेतावर, कुणी कारखान्यात तर कुणी कचेरीत. पुरुषार्थ करून सृष्टीला संपत्ती वैभवाने समृद्ध करण्याचा हा काळ असतो. मध्ये विश्रांतीची वेळ असते. शेतात शेतकऱ्याची बायको त्याच्यासाठी शिदोरी आणते. शहरात कँटिनमध्ये गप्पा मारत कामगार आणि कारकून चहा पितात. तो चहा अमृतमोलाचा वाटतो. 

               सायंकाळी कामाचे श्रम संपलेले असतात. आपल्या घरी बायकामुलात मिसळून जीवनाचा आनंद उपभोगण्याचा हा काळ असतो. नुसता टी. व्ही. पाहत बसले तरी मजा येते. 

               मध्यरात्र म्हणजे तर सौंदर्याची सम्राज्ञीच. चंद्राचा दुधाळ प्रकाश सर्व विश्वात पसरलेला असतो. जिकडे तिकडे नीरव शांतता असते. श्रमाचे नाव नसते. केवळ आनंद मध्यरात्रीच अनुभवता येतो. 

             'बालपणात जीवन जगण्यात काही वेगळीच गोडी असते. साऱ्या जगाच्या वात्सल्याचा आपल्यावर वर्षाव होत असतो. निरागस आनंद केवळ बालवयातच अनुभवता येतो. इंद्रधनुचे मनोहारी रंग आपले भान हरवतात. चंदामामाला पाहून आपल्या साऱ्या वेदना विसरून जाऊन आपण हसू लागतो. गारगोटीतही आपल्याला सौंदर्य दिसते. रंगीबेरंगी फुगे आपल्याला मोहक वाटतात. सौंदर्य, सुख वेगळे आणि पैसा वेगळा. पैशापाठीमागे धावण्याचे वय अजून यायचे असल्याने खरे सौंदर्य आणि खरे सुख आपण बालवयातच अनुभवतो.

                 तारुण्य हे शौर्याचे आणि प्रीतीचे प्रतीक आहे. या वयात आपण महत्त्वाकांक्षेने प्रेरित होतो. माणूस उंच होतो तो याच वयात ! भगतसिंग अमर झाला तो याच वयात! तारुण्यात सर्व प्रकारच्या प्रेमाची आग धगधगत असते. त्य आगीतून चालण्याचे जीवन जगण्यातही मौज आहे. 

                म्हातारपणी जीवन जगण्यात वेगळीच मौज आहे. सारे लोक आपला सन्मान करतात, वाकून नमस्कार करतात, या वयात सारे विश्वच आपले कुटुंब बनते. सागराची विशालता आणि आकाशाची व्यापकता आपल्या मनाला येते. जगण्याचा आस्वाद केव्हाही व कुठेही घेता येतो. 

              पण कधी-कधी जीवनात संकटांचे डोंगर कोसळतात, दुःखांचे आघात होतात, उद्विग्नता आणि निराशा यांच्या काळोखात मन काळवडून जाते. जे हवे ते मिळत नाही, जे घडावे असे वाटते ते घडत नाही. अशावेळी जीवन जगणे नकोसे वाटते. जीवनात आनंदच उरलेला नसतो. जगण्यातील आनंद कसा मिळावा? मिळतो, याही स्थितीत जगण्याचा व जीवनाचा आनंद मिळतो. मी माझ्यासाठी नव्हे, इतरांच्यासाठी जगत आहे एवढा विचार मनात आणला की मनावरची मरगळ निघून जाते. मी देशासाठी जगतो आहे. माझ्या समाजासाठी जगतो आहे,आणि त्यांना माझी गरज आहे, मला त्यांच्यासाठी जगायचे आहे या निर्धारातही आनंद आहे. मग दुःखाचेही कौतुक वाटू लागते. एक अतूट आशावाद मनात निर्माण होतो. मग भगतसिंग, राजगुरुही हसतहसत फासावर जातात आणि जगण्यातील आनंद उपभोगतात. ह्या अत्युच्च आनंदाची खुमारी अनुभवायची तर एकच प्रमेय दृष्टीपुढे असले पाहिजे.

       जिद्द आणखी हिंमत यांचा सुरेख संगम घडे सुरु अमुचा प्रवास अविरत ध्येयमंदिराकडे

सप्टेंबर ०७, २०२२

मी पाहिलेले शिल्प / प्राचीन मंदिर

 मी पाहिलेले शिल्प / प्राचीन मंदिर 



                'साध्याही विषयात आशय किती मोठा कधी आढळे केशवसुत. एखाद्या शिल्पातला आशयही असाच आपल्या हृष्टीतून आणि मनातून निसटून जाणारा पण अतिशय सधन असते प्रत्ययकारी असतो आणि जीवनदर्शीही असतो

             सहज जाता जाता मला एक प्राचीन मंदिर दिसले आणि मग ते मी पाहिले. दिसणे आणि पाहणे यात फरक आहे. चहाच्या भांड्यावर झाकलेली तबकडी वाफेने उडते हे अनेकांना दिसले होते पण न्यूटनने ते पाहले. कलाकृती आपल्याला सौंदयांचा अनुभव देतात पण तो घ्यायला आपले व्यक्तिमत्त्वही सिद्ध असावे लागते. म्हणूनच सौंदर्याचा अनुभव हा जितका कलाकृतीया तितकाच आपल्या मनोभूमिकेवर अवलंबून असतो. यामुळे कलाकृती पाहताना पाळावयाची सारी पथ्ये पाळूनच मी या प्राचीन मंदिर शिल्पाचा आस्वाद घेतला, घेऊ शकलो. 

            माधव आचवल यांनी 'रूप पाहता लोचनी' या लेखात अतिशय मार्मिक अभिप्राय व्यक्त केला आहे की कलाकृतीचा आस्वाद घ्यायचा तर ती पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या दिशांनी, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या दृष्टींनी पाहावी लागते. कलाकृतीचा अनुभव स्पर्श, रूप, ना गंध इत्यादी संवेदनांनी घ्यायचा असतो. तो माणसांच्या गर्दीत व कोलाहलात मिळत नाही, तो कॅमेऱ्यात टिपता येत नाही, सहलीत अनुभवता येत नाही. कलाकृतीचा आस्वाद घेताना आपल्या मनाची अवस्था 'आपुला ठावो न सोडिता आलिंगिजे चंद्र प्रकटता अशी ज्ञानेश्वरांनी वर्णिलेल्या कुमुदिनीसारखी संवेदनशील असावी.

            रुक्मिणी मंदिर पॅलेस, नागपुरातील महालविभागात राजे भोसले यांच्या राजवाडा परिसरातले एक अप्रतीम शिल्प. 

          दगडी महादुवार. महाद्वाराच्या भितीतच पहारेकऱ्यांना ऐसपैस राहता येईल अशी जागा. सभामंडपात अठ्ठेचाळीस लाकडी खांब. त्यावर विणकाम करावे तशी जाळीदार बारीक नक्षी, फुले, डिझाइन्स आणि द्राक्षांचे घोस हे त्या नक्षीकामातील मन वेधून घेणारी वैशिष्ट्ये. गाभारा संगमरवरी दगडाचा. 

          हे मंदिर दगडाचे. दगडावरील शिल्प दक्षिणेतील मीनाक्षी व कामाक्षी या मंदिरांची आठवण करून देणारे. दगडावर कितीतरी फुले, प्राणी व माणसे कोरलेली, अनेकप्रकारच्या कोरलेल्या फुलांत कमळाचे प्रमाण अधिक, हत्तींची विविध रूपे दोन हत्ती रांगेत चालणारे, दोन हत्ती परस्परांशी झुंजत असलेले, एका हत्तीचा पाय मगर ओढत असलेली. 

            खाली दगडी चौकोनात मत्स्यावतार, वर चौकोनात कुर्मावतार, त्याच्यावर वराहावतार, त्यानंतर क्रमाने नृसिंहावतार यायला हवा. पण आधी वामनावतार नंतर नृसिंहावतार, पुढे राम व नंतर कृष्णावतार. बुद्धावतार दिसला नाही. आता परत खालून वर पाहत जायचे. दगडी चौकोनात कृष्णलीला अमर करून ठेवलेली. कृष्ण मुरली वाजवतो, गाई व गोपी तल्लीन होऊन ऐकतात. कृष्ण कालियामर्दन करतो. कृष्ण शेषयायीवर बसलेला. कृष्णाने गोपींची वस्त्रे झाडावर टांगलेली आणि स्वतः झाडावर जाऊन बसलेला. विवस्त्र गोपी करुण नजरेने कृष्णाकडे पाहत असलेल्या. कितीही एकांत असला तरी कुलीन मुलींनी विवस्त्र स्नान करू नये ही शिकवण कृष्णाला गोपींना द्यायची होती का? 

               गंधर्वलोकातच आपण फिरत आहोत असे वाटावे असे संगीतमय वातावरण. कुणी तबला वाजवतात, कुणी वीणा झंकारतात, कुणी भेरीचा ध्वनी काढतात. घोड्याचे तोंड असलेले किन्नरही या संगीत समारंभात सामील झालेले असतात. 

               पण या सर्वांहून आपले चित्त वेधून घेते ती स्त्रियांची डौलदार शैली. एक स्त्री विश्वविचारात रंगून गेल्याप्रमाणे अधोवदनानं बसली आहे. त्यामुळं तिच्या पापण्या डोळ्यांवर आल्या आहेत. नाक सरळ आणि लांब चाफेकळीसारखं आहे. भुवया धनुष्याकृती व लांब आहेत. पण ती योगिनी वाटत नाही. एक स्त्री साधीच उभी आहे. तिचा उजवा पाय डाव्या पायाच्याही डाव्या बाजूला करून तो बोटांवर टेकलेला आहे. मान किंचित तिरपी आहे. केसांचा आंबाडा आहे. कानात कानाच्या वरपासून जवळजवळ मानेपर्यंत रुळणारी कर्णफुलं आहे. नर्तकीपेक्षाही आकर्षक पोझमध्ये ती उभी आहे. नृत्यांगना तर अनेक आहेत. अजिंठ्याची चित्रकला इथे दगडी • शिल्पात साकार झाली आहे.

               हे शिल्प पाहून आपण नकळत नतमस्तक होतो, कारण 'दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती'.

सप्टेंबर ०७, २०२२

माझे जत्रेतील अनुभव

         माझे जत्रेतील अनुभव 



         हेलावे जनसागर माझ्या अवतीभवती खरे सांग, ही नाना रूपे तुझीच नव्हती? मनामनातून त्यांच्या होती तुझी चेतना कर्माकर्मातून होती तुझी प्रेरणा

 मंगेश पाडगावकरांच्या या अनुभूतीचा साक्षात्कार केवळ जत्रेतच होत असतो. चंद्रकुमार नलगे यांना 'गावाकडच्या जत्रेत जे अनुभव आले तसे बरेचसे पण त्याहून काही वेगळे अनुभव मला माझ्या गावच्या जत्रेत आले. दसऱ्याच्या नवरात्रात नागपूरला बंगाल्यांच्या देवीजवळ नऊ दिवस जत्रा भरत असते. जत्रा म्हणजे हौस, मौज सर्वांचेच नटाथटायचे दिवस. गोरगरीब जत्रेसाठी आधीपासूनच पैसे साठवतात. मुलं नवेनवे कपडे, घालून जत्रेला येतात. तरुणांना आपला दिमाख दाखवावासा वाटतो. लहानगे नात नातू गर्दीत हरवू नयेत म्हणून आजोबा त्यांना सारखे दटावत, त्यांचा हात घरत, इकडून तिकडे धावपळ करताना दिसतात. 

             देवी शृंगारलेली असते. तिने आपल्या भाल्याने अक्राळविक्राळ राक्षसाला ठार केले आहे. त्याचे लहान मुलांना मोठे कौतुक वाटते. देवी ज्यावर विराजमान झाली आहे त्या वाघाकडे काही लहानगे अगदी कुतुहलानं पाहतात आणि वडीलधाऱ्यांना नाना प्रश्न विचारुन भंडावून सोडतात. देवीच्या अंगणात बेलफूल विकत मिळतं. ते घेऊन देवीला वाहताना स्त्रिया अत्यंत भाविकपणे प्रार्थना करतात आणि त्यांचे पाहून लहानगेही देवीला हात जोडतात. अशावेळी आरती चालू असली तर बहुधा कुणीही आरती संपल्याशिवाय जत्रेला जात नाहीत. आरती घेऊन पुजारी माणसांच्या समुद्रात शिरतो. लोक त्याला पुढं सरकूच देत नाहीत. गर्दी एवढी असते की पुजाऱ्याची फक्त पगडीच मागंपुढं होताना दिसते. 

              इथे जत्रेचे दोन भाग पडतात. एक म्हणजे तिकीट असलेले प्रदर्शन आणि दुसरा म्हणजे तिकीट नसलेली जत्रा. बहुतेक लोक प्रदर्शन पाहल्यावर जत्रेत जातात. प्रदर्शन हा जत्रेचा प्रतिष्ठित भाग असतो. इथे वेगवेगळी दुकाने असतात. भाव महाग असल्यामुळे दुकानात फारशी गर्दी नसते. पण लहान मुलांच्या खेळणीचा चांगला उठाव होतो कारण तुला देवीच्या प्रदर्शनातून खेळणी घेऊन देईन' असे मुलाला आईवडिलांनी सांगितले असते त्याची आठवण मुल आईवडिलांना वारंवार करुन देत असतात. पाळणे व मेरी गो राऊंडला चांगली गर्दी असते. प्रदर्शनाचा काही भाग पाहल्यानंतर भुईमुगाच्या शेंगा, भेळ, पॉपकॉर्न, आइसक्रीम तेथल्या तेथेच टॉवरजवळील जमिनीवर बसून खाण्याचा आनंद अनेक कुटुंब उपभोगताना आढळतात. मुलगा हरवल्यास ध्वनिक्षेपकावरुन हे वृत्त सांगण्यात येते. आपल्या मुलाचे नाव ध्वनिक्षेपकावरुन घेतले जावे म्हणून मुलाला आईजवळ बसवून तो हरवला असल्याचे वृत्त ध्वनिक्षेपक संयोजकाला देतानाही अनेक बाप पाहायला मिळतात. मोठे मजेदार अनुभव येतात. 

          लोक देवीच्या दर्शनापर्यंत मोठ्या श्रद्धेने वागतात. मग मात्र मौज करावी एवढ्याच हेतूने जत्रेत सामील होतात. राजरोसपणे ज्यांना भेटता येत नाही असे तरुण-तरुणी प्रदर्शन हे आपले भेटण्याचे संकेतस्थळ बनवतात. देवीच्या दर्शनाला जाण्याचे निमित्त आणि प्रदर्शनात कुणाबरोबरही बोलण्याची मुभा ही त्यांना पर्वणीच असते. गर्दीचे निमित्त साधून रोडसाईड रोमिओंनी मुलींना धक्के मारू नये यासाठी पोलीस यंत्रणा सुसज्ज असते. 

             पण खरी मजा येते विनातिकिटाच्या जत्रेत इथं खाऊची दुकानं असतात आणि गरिबांना ती परवडणारी असतात. फोटोच्या दुकानात सिनेनटीसोबत किंवा विमानात बसून असे फोटो काढून मिळतात. खेड्यातील लोकांना हे फोटो काढण्यात मजा वाटते. बंदुकीच्या गोळीने फुगा फोडणे किंवा एखाद्या वस्तूवर रिंग फेकणे व ती वस्तू मिळवणे अशाही ठिकाणी गर्दी असते. बहुधा प्रत्येक लहान मुलांच्या हाती फुगा असतोच. 

            इथे खरोखरच एक छोटा मुलगा हरवला होता. जोरजोराने रडत होता. त्याला काहीतरी घेऊन द्यावे, त्याचे रडणे थांबवावे व मग त्याला पोलिसांच्या स्वाधीन करावे म्हणून मी त्याचा हात धरला. काय घेऊन देऊ म्हणून विचारले पण तो काहीही घ्यायला तयार नव्हता. त्याला फक्त त्याची आई हवी होती. मला प्रसिद्ध उर्दू लेखकाची कथा आठवून गेली. 

             जत्रेचे अनुभव वेचायला मी बहुधा नऊही दिवस जत्रेला जात असतो. दसऱ्याच्या दिवशी जत्रा संपते. एकदोन दिवसांनी पालं उठतात. नऊ दिवस उडालेले रंग आणि गंध मागे पाळणेवाले, फुगेवाले, शेंगावाले आणि दुकानदार सारेच आपापले सामान गुंडाळून निघून टाकून जातात. दहापंधरा दिवसांनी मी जेव्हा त्या रस्त्यावरून जातो तेव्हा जत्रेतल्या स्मृती जाग्या होतात. उगीच एक अनामिक हुरहुर मनाला स्पर्श करून जाते, जत्रेच्या जागेकडे मी मागे पाहतो आणि तुकोबाची सासुरवाशीण कानात गुणगुणते. वळून

 कन्या सासुरासी जाये मागे परतुनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा ....

सप्टेंबर ०७, २०२२

निसर्गाकडे चला

 निसर्गाकडे चला / निसर्ग मानवाचा सोबती / निसर्ग : एक महान गुरु 



"दिव्यरसी विरणे जीव जीवित हे त्याचे नाव "

              ह्या अनुभूतीचा साक्षात्कार केवळ निसर्गातच होऊ शकतो. म्हणून जीवनाचा उत्कट, आस्वाद घ्यायचा असेल तर निसर्गाकडे चला. निसर्ग हा मानवाचा सोबती तर आहेच पण तो एक महान गुरुही आहे.

              व्यं. रा. वनमाली म्हणतात की वृक्ष आपले जिवलग मित्र आहेत. आपल्या आयुष्यात जशी जवळची माणसे आनंद व प्रकाश आणतात तसेच वृक्षसुद्धा सुख देतात. आनंदाच्या क्षणाची आठवण ठेवायची असली तर वृक्षासारखा दुसरा मित्र नाही.

              पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली 'निसर्ग आपला मित्र या लेखात लिहितात की निसर्गाच्या सहवासात राहण्यासारखा दुसरा आनंद नाही. या छंदामुळे मी मनाने प्रसन्न आणि शरीराने निरोगी राहू शकलो. निसर्ग आपला शेवटपर्यंत सोबत करणारा सच्चा दोस्त आहे.

               बोधिवृक्षाखाली बसणारा बुद्ध, वनस्पतींना हृदय आहे हे सांगणारा जगदीश बोस, देवदारच्या वनात बसून काव्य करणारा शेले, टेकडीवर अभंग करणारे तुकाराम आणि डोंगरावर परमेश्वरी संदेश ऐकणारे पैगंबर, मेघदूत लिहिणारे कालिदास, वृक्षांना उच्चतम आकांक्षांचे प्रतीक मानणारा अर्नोल्ड, सागरा प्राण तळमळला म्हणणारे सावरकर या सर्व थोरांनी निसर्गातून प्रेरणा घेतली, म्हणजे निसर्ग हाच त्यांचा गुरू.

                अरुणोदयाचे मोहमयी सौंदर्य देखील खऱ्या अर्थाने निसर्गातच घडते. अरुणोदयात डोंगरावरचा मेघ तेजाने न्हाऊन निघतो आणि पाहता-पाहता आपलेही अंतःकरण त्या तेजाने उजळून जाते. 

               निसर्गाकडे चला, सर्वत्र नावीन्याचा लखलखाट दिसेल. जग उत्पन्न होऊन इतकी वर्षे झाली, पण रोज सकाळी ते नवीनच जन्माला येते आहे असे वाटते. सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे सोने पहिल्यासारखेच पिवळेधमक आहे. आभाळाचा निळा रंग अजून विटला नाही. कळ्याफुलांचा सुगंध अजून उडाला नाही. तृणांची हिरवीगार मखमल अद्याप टवटवीत आहे. निसर्ग म्हणजे जे रम्य आणि भव्य त्याचे प्रत्ययकारी दर्शनच.

                समुद्र केवढा सखोल, विशाल आणि अथांग! भरतीच्या आणि ओहोटीच्या तालावर आपल्या मनोवृत्ती अखंड नाचत असतात. किनाऱ्यावरच्या उंचउंच माडांच्या आणि नारळीच्या झाडाप्रमाणे आपणही सुसाट वाऱ्यात धुंद होऊन अष्टौप्रहर डोलत असतो. पहाटेच्या वेळा अंगावर लाटांचे तुषार झेलीत, ओल्या आणि भुसभुशीत वाळूवर अनवाणी चालण्यात केवढे काव्य आहे! 

                राजा माणसांचे स्वार्थी जग आपण पार विसरून जातो. उंच-उंच डोंगरांवर निळेभोर आधाळ वसलेले असते. झाडाझुडुपांच्या आणि खळखळणाऱ्या इवलाश्या झऱ्यांच्या संगतीत दिवस कसा निघून जातो ते कळत नाही. झाडांना हलता येत नाही, बोलता येत नाही, ती एकाच .जागेवर उभी असतात. पण त्यांच्या जगात काही ना काही उलाढाली चाललेल्याच असतात. जुन्या झाडांची पाने गळत असतात. नवीन-नवीन पालवी फुटत असते. काहींना फुले येतात तर काहींना मोहर येतो. झुडुपांवर तुरे डोलत असतात. वेलींवर कळ्या हसत असतात. हिरव्या सृष्टीतल्या या रहिवाशांना स्वस्थपणा कसा तो माहीत नसतो. उन्हाळ्यात वाऱ्यांच्या झुळुकांशी ते थट्टामस्करी करत असतात. पावसाळ्यात मुसळधार पावसाशी त्यांची दंगामस्ती चाललेली असते. हिवाळ्यात धुक्याची दुलई अंगावर ओहून आत ते काहीतरी गडबड करीतच असतात.

                 जीवन आनंदमय करणारी संजीवनी म्हणजे निसर्ग होय. मृत्यूची चाहूल लागली की माणसे उदास व हताश होतात. पण झाडे मात्र पानगळतीची चाहूल लागताच सळसळतात, रंगाची उधळण करतात, रंगोत्सव साजरा करतात. ती मृत्युभयाने भयभीत होत नाहीत किंवा खिन्नही होत नाहीत. एक पान गळले तरी त्याच्या जागी नवे पान येणारच आहे असा अमरत्वाचा संदेश निसर्गगुरु देत असतो. हे अमृताचे द्रोण निसर्गातच प्यायला मिळतात. बा. भ. बोरकर

 'गळण्याआधी या कवितेत लिहितात, गळण्याआधी सळसळुनी ही रंग उधळती पाने आग लागल्यागत राळांचा फाग खेळती राने म्हणती आता अपर्ण होऊ झेलु हिमवर्षा हे सामोरे सहर्ष आम्ही नव्या जिण्याच्या स्पर्शा

           माणसाच्या मनावर असलेल्या प्रतिष्ठेच्या व व्यावहारिक गोष्टींच्या दडपणामुळे निसर्गाच्या आनंदाला तो कसा मुकत असतो ह्याचे हृद्य चित्रण म. ना. अदवंत यांनी 'निसर्ग आणि आम्ही या ललित निबंधातून केले आहे. आपण आपले जीवन अनेक वेळा पैशांच्या दिशेत बसवण्याचा प्रयत्न करतो. प्रतिष्ठेची खोटी वलये आपल्याभोवती निर्माण करतो आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या चाकोरीला जीवन असे नाव देऊन त्या जीवनातच आनंद प्रयत्न करतो. बाहेर टिपूर चांदणे पडले असतानाही काव्यातील किंवा कादंबरीतील चांदण्यांची वर्णने विजेच्या दिव्याच्या प्रकाशात मिटक्या मारीत वाचणारे आम्ही रसिक आहोत. निसर्गाच्या भव्य सौंदर्याशी समरस होण्याची पात्रता आमच्या ठिकाणी नाही आणि तशी इच्छाही नसते. आमची सर्व रसिकता कृत्रिम व नकली सौंदर्याचे कौतुक करण्यात गुंग होऊन गेलेली असते. निसर्ग म्हणजे जीवाला अनिर्वचनीय आनंद देणारा दिव्यरस आह.

               निसर्ग सारे क्षुद्र पाश तोडतो आणि आपल्याला अननभूत आनंदाचा अमोल ठेवा देऊन जातो. निसर्गाच्या भव्यत्वाचा साक्षात्कार आणि त्याचा सतत आस्वाद म्हणजेच तर जीवन आणि मग आठवून जातेपं. नेहरूसारख्या रसिकांच्या मनावर विलक्षण मोहिनी टाकणारी रॉबर्ट फ्रास्टची जागतिक कीर्तीची कविता.

   झाडी सुंदर दाट अन् काळीभोर आहे पण अजून खूप सारी कामं उरकायची आहेत अन् कितीतरी अंतर तोडायचं आहे मी झोपण्याआधी.

शनिवार, २० ऑगस्ट, २०२२

ऑगस्ट २०, २०२२

हुतात्म्याचे मनोगत

           हुतात्म्याचे मनोगत 

                    देशासाठी मी हुतात्मा झालो याचा मला अभिमान वाटतो. माझा देश पारतंत्र होता. आम्हाला स्वराज्य हवे म्हणून साम्राज्यवाद्यांना आम्ही परोपरीने सांगितले होते पण आ सहनशील आहोत म्हणजे दुर्बल आहोत, असा त्यांनी समज करून घेतला होता. हा त्यांचा सम आम्हाला दूर करायचा होता.

                    शिवाय माझ्या देशात पारतंत्र्यातच सुख मानणारेही अनेक लोक होते. त्यांच्या हृदयात आम्हाला स्वातंत्र्यज्योत चेतवायची होती. यासाठी आम्हाला बलिदान देणे आवश्यक होते. साम्राज्यशाहीला हादरा देणे आणि स्वदेशवासियांच्या मनात स्वातंत्र्याची अभिलाषा व पारतंत्र्याविषयी तिरस्कार निर्माण करणे असे दुहेरी कार्य आम्हाला करायचे होते. म्हणून आम्ही सशस्त्र क्रांतिकारक बनलो. 

                    पण माझ्या देशाला फितुरीचा भयानक शाप आहे. माझी, माझ्या देशाची, माझ्या रक्ताची माणसे फितूर झाली आणि त्यांनी आमची नावे इंग्रज सरकारला कळवली. आम्ही पकडलो गेलो. आम्हाला फाशीची शिक्षा झाली. 

                    आम्ही देशभक्ती केली होती, इंग्रजांनी तिला राजद्रोह नाव ठेवले होते. पण तुरुंगातही आम्ही क्रांतीचाच जयजयकार करत होतो. आमच्या हातांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला. गळ्यांनी तिच्या कीर्तीचे गुणगान केले. तिच्या पावलांची पूजा केली. आमच्या देहाचे तिच्यासाठी समर्पण केले. याचा परिणाम म्हणून आमच्या हातात बेड्या पडल्या, पायात पोलादी शृंखला पडल्या. गळ्यात फासाचा दोर अडकला. फाशीची शिक्षा हसतहसत स्वीकारण्यासाठी आम्ही छाती पुढे केली. 

                   कारण आमचा आवेश अभंग होता. आम्ही जाणूनबुजून सतीचे वाण स्वीकारले होते. स्वातंत्र्याच्या ध्येयापायी आम्ही बेहोश झालो होतो. आम्ही ना मागे पाहिले ना विश्रांतीसाठी थांबलो, ना प्रेम, कीर्ती, संसार यांचे धागे आमच्या ध्येयापासून आम्हाला दूर करू शकले. आम्हाला दिसत होता फक्त एकच तारा स्वातंत्र्याचा! 

                    आणि एक दिवस मला भेटायला माझी आई आली. तिच्या डोळ्यात आसवे होती. मी म्हणालो, 'आई, तू शोक करू नकोस. कारण मृत्यू हा केव्हातरी येणारच आहे. पण आपला देश पारतंत्र्यात असूनही त्याच्या स्वातंत्र्याकरिता जो लढत नाही त्याच्या जगण्यालाही अर्थ नाही आणि मृत्यूलाही अर्थ नाही. त्यालाही मृत्यू येतोच पण स्वर्ग मिळत नाही. उलट देशाच्या स्वातंत्र्याकरिता लढता लढता ज्याला वीराचे मरण प्राप्त होते त्याला स्वर्गलोक प्राप्त होतो. त्याच्या जीवनाचे आणि मृत्यूचेही सार्थक होते.' 

                     मी आईची समजूत घालताना म्हटले, “स्वातंत्र्य हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे." हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जो बलिदान देतो त्याचा वास्तविक आदर व्हायला हवा पण पारतंत्र्यात असे होत नाही. उलट त्याला फासावर चढावे लागते. असे कितीतरी दुर्दैवी प्राणी असतील की जे अपराधावाचून मेले असतील. पारतंत्र्यात माणसाला अन्यायच मिळतो. 

                आई तु शेक करू नकोस. या शरीराला कुणी आसवांची आंघोळ घाला की प्रेमाची उटी लावा म्हणजे मातीचा पुतळा असल्यामुळे शेवटी ही माती मातीलाच मिळून जाणार.देह नश्वर आहे म्हणून तुला आक्रोश करण्याचे काही एक कारण नाही. खरे तर तुझ्याच पोटी पुनर्जन्म घेऊन मी तुला नऊ महिन्यांनी भेटणार आहे.' 

                  आणि दुसऱ्या आईला, मातृभूमीला निरोप दिला, की तू रडू नकोस. पारतंत्र्याच्या दुःखाने अश्रू ढाळू नकोस. तुझा लवकरच भाग्योदय होणार आहे कारण अंधाराच्या पोटात पहाटेचा प्रकाश असतो. 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल!' आज आमची चिता रचली आहे, त्यात आमची राख होणार आहे. पण त्या राखेतून, फिनिक्स पक्ष्यांप्रमाणे, उद्याचे क्रांतिवीर निर्माण होणार आहेत. ते भावी क्रांतीचे नेते तुझ्या पायातील पोलादी बेड्या खळखळा तोडून टाकणार आहेत. 

                 मग आम्ही फासावर जात असतानाही 'वंदे मातरम्' चा जयघोष केला. आनंदाने मृत्यूचे चुंबन घेतले. मृत्यूनेही आमचे स्वागत केले, कारण आम्ही ‘मृत्युंजय' झालो होतो !

               आमचे बलिदान वाया गेले नाही, मातृभूमी मुक्त झाली, यात आमच्या मरणवेदनाही आम्ही विसरून गेलो आहोत. येतो भरुन ऊर होतात सूर वेडे हे माय मातृभूमी गातो तुझे पवाडे

ऑगस्ट २०, २०२२

मी तुरुंग बोलतोय

          मी तुरुंग बोलतोय



 'भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी काठी हाणू ।।' हे माझे ब्रीद आहे. किती किती सुखद आणि दुःखद आठवणी माझ्या मनात भरुन आहेत म्हणून सांगू ! काही आठवणींनी माझा मलाच तिरस्कार वाटतो, तर काही स्मृतींमुळे माझा उर अभिमानाने भरून येतो. पण जेव्हा कधी या थोर व्य भगतसिंग तर 'वंदे मातरम्' म्ह तेव्हा मी परतंत्र होतो म्हणू आहे. भारतमातेच्या स्वातंत्र्यात वाटेकरी राहणार आहे कारण दु दय आ.  

                  माझे नाव काढताच काही माणसांच्या अंगात कापरे भरते. त्यांचे पाय लटपटतात. भीतीने त्यांचे अंग शहारते. कारण माझी शिस्त फार कडक आहे. माझ्याकडे इतकेकाम करावे लागते की काम करता करता काहींचा जीवही जाती. चोर, दरोडेखोर रामोशी खुनारी साना मी अशी शिक्षा करतो की त्यांना कायमची आठवण राहावी, चांगलीच अटल पदवी 

                 पण म्हणून मी निष्ठुर आहे असे मात्र तुम्ही समजू नका ही समाजकटक असलेली माणसे कठोर शिक्षेशिवाय ताळ्यावर येत नाहीत. म्हणून मला असे वागावे लागते. 

                मी नसतो तर तुमच्या दुनियेत सज्जनाना जीवन जगणे केवळ असदा झाले असते. मी सज्जनांचा पाठीराखा आणि दुर्जनाचा काळ आहे.

                गीतेत भगवान श्रीकृष्णाने हेच सांगितले आहे. ईश्वर अवतार घेतो तो दोन कारणांसाठी.. एक कारण म्हणजे सज्जनांचे संरक्षण करणे आणि दुसरे कारण म्हणजे दुर्जनांचे पारिपत्य करणे. ईश्वरी अवताराचे हे दुसरे कार्य मी करत असतो. म्हणून मी कठोर नाही, हवे तर मला तुम्ही न्यायदेवता म्हणू शकाल.

                म्हणून तर एस. एम. जोशी मला विद्यापीठ म्हणतात. कारण माझ्याकडे चर्चा चालतात, वादविवाद होतात. लोकमान्य टिळक, पंडित नेहरू यासारखे लोक माझ्याच घरी ग्रंथलेखन करतात. कुणी संगीत शिकतात तर कुणी निरनिराळ्या भाषांचा अभ्यास करतात. कोणतेही काम हलके किंवा नीच मानू नये असे मी शिकवतो. माझ्या दुनियेत मानवतेचा साक्षात्कार व अनुभवांची विविधता मिळते. 

                 तुम्हाला आठवत असेल की माझ्या पोटी श्रीकृष्णासारखे लोकोत्तर पुरुष जन्माला आले आहेत. कंसाचे अत्याचार पराकोटीला पोचले होते. त्याचे सामान्य जनतेवरील जुलूम दूर करायला भगवान श्रीकृष्णाने माझ्या पोटी जन्म घेतला. त्या रात्री आनंदाने साखळ्या तोडून मी दारे मोकळी केली होती. बाहेर दुथडी भरून वाहणारी यमुना माझ्याकडे अभिमानानं पाहत होती. श्रीकृष्णाने माझ्या कुशीत जन्म घेतला आणि मी कृतार्थ झालो.. मी पारतंत्र्यात असतो तेव्हा अशा लोकोत्तर पुरुषांना व सज्जनांना माझ्याकडे पाठवण्यात येते किंवा राजा जुलुमी असेल तर त्यावेळी स्वातंत्र्यात देखील सज्जनांवर ही पाळी येते. बरेचदा ही माणसे नुसती सज्जनच असतात असे नव्हे तर ती राष्ट्राचा गौरव असलेली अशी मोठी माणसे असतात. ती माणसे म्हणजे राष्ट्राचा प्रकाश असतात. 

                  पण पारतंत्र्यात त्यांनाही माझ्याकडे पाठवले जाते. त्यांना फटके खावे लागतात. अपमानही सहन करावा लागतो, तेव्हा मात्र माझ्या डोळ्यांतून आसवे गळतात. 

                   महात्मा गांधी माझ्याकडे याला राहले आहेत. लोकमान्य टिळक माझ्याकडे मंडालेला आले होते. सावरकर तर अंदमानला माझ्याजवळ खूप काळ राहिले. मी तर असे म्हणेन की जेवढी म्हणून मोठी माणसे झाली ती बहुतेक सर्वच माझ्याकडे राहिली आहेत. पंडित नेहरू राहले, सरदार वल्लभभाई पटेल राहले, विनोबा भावे राहले.. ज्या मुली माझ्याकडे राहायला आल्या त्या फार मोठ्या झाल्या. पण सर्वच नाही है। चांगल्या कामामुळे ज्या माझ्याकडे येतात त्याच मोठ्या होतात, कमला नेहरू, सरोजिनी देवी नायडू या अशा मुली होत. 

                   पण जेव्हा कधी या थोर व्यक्तींचे माझ्या घरी हाल व्हायचे तेव्हा मी ढसढसा रडायचो. माझा भगतसिंग तर 'वंदे मातरम्' म्हणत म्हणत माझ्याच घरी फासावर गेला. 

                   तेव्हा मी परतंत्र होतो म्हणून माझ्या घरी देशभक्तांचे हाल होत. पण आता मी स्वतंत्र झालो आहे. भारतमातेच्या स्वातंत्र्यात माझाही लहानसा वाटा आहे. स्वराज्याप्रमाणेच सुराज्यातही मी वाटेकरी राहणार आहे कारण दुष्टांना शिक्षा करणे हेच माझे ध्येय आहे.. दया तिचे नाव । सुष्टांचे पालन। आणिक निर्दालन। कंटकाचे ।।। तुकाराम.