तो देव जाणावा / केल्याने होत आहे रे / प्रयत्नांती परमेश्वर/ उद्योगाचे घरी
गळावा घाम अंगीचा यशोदेवी तयासाठी करी घे हार पुष्पांचा - यशवंत 'विद्यार्थ्यांनो, जागृत व्हा' या लेखात डॉ. आंबेडकरही म्हणतात की दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशः प्राप्ती होत असते.
अमाने मातीचेही सोने बनते आणि अमावाचून सोन्याचीही माती होते. कारण 'प्रयत्नांती परमेश्वर असतो. म्हणून केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे असे समर्थ म्हणतात. तुकारामांनीही म्हटले आहे, 'असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, "केल्याने होत आहे रे, ' 'उद्योगाचे घरी ऋद्धि-सिद्धि पाणी भरी प्रयत्नांती परमेश्वर या तीनही वचनांचा अर्थ एकच आहे.
महापुरुषांच्या जीवनात हेच घडले आहे. नेपोलियन म्हणे, 'माझ्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नाही.' 'एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावण्यासाठी नऊ हजारवेळा प्रयोग केले आणि आपल्या अविश्रांत परिश्रमाने आणि चिकाटीने हा प्रयोग सफल करून दाखवला. मादाम क्युरी यांनी रेडिअमचा शोध लावताना असेच अथक प्रयत्न केले. त्यात मृत्यू येण्याची शक्यता असूनही त्यांनी प्रयत्न सोडले नाही. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर मिळालाच मिळाला. न्यूटनचेही उदाहरण लेच सांगते. सतत तीस वर्षे अहोरात्र प्रयत्न करून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत
वैज्ञानिकांप्रमाणेच इतरांची उदाहरणे घेता येतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत खडतर परिश्रमातून महाराष्ट्रात स्वराज्याची संस्थापना केली. क्रांतिकारकांपासून तो टिळक गांधीपर्यंत अनेकांनी अविरत कष्ट सोसले, तुरुंगवास सहन केला तेव्हा स्वराज्याची प्राप्ती झाली, महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी लोकांचा छळ सहन करूनही समाजसेवेचे व्रत कायम ठेवले म्हणून आज स्त्रियांच्या शिक्षणाचा एवढा प्रसार दिसतो आहे. डॉ. आंबेडकरांनी दलितांना वर उठवण्याच्या कार्यात केवढेतरी अपार कष्ट सहन केले आहे. त्याने जगापुढे मांडला."
साध्या व्यवहारातही आपल्याला हाच अनुभव येतो. काही केलेच नाही तर फळ मिळणार कसे? एक शिक्षक होता. शिक्षक म्हटला, की तो गरीबच असणार, श्रीमंताचे वैभव पाहून त्याला वाटे की असे वैभव आपल्यालाही मिळाले तर काय बहार होईल । त्याने वैभव मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. शिक्षक होता म्हणून पुस्तकांचाच व्यवसाय त्याने पत्करला. स्वतः लिहू लागला. लिहिलेली पुस्तके विकू लागला. शाळा-शाळा हिंडू लागला. आज तो लक्षाधीश आहे. वैभव त्याच्या पायाशी लोळते आहे.
धर्मक्षेत्रात येशू ख्रिस्त हा फार मोठा माणूस त्याने खिश्चन धर्म स्थापन केला. जगाला नवा प्रकाश दिला. त्याच्या विचाराच्या प्रभावाने आज संपूर्ण युरोप, अमेरिका आणि इतर खंडही त्याचे अनुयायी बनले आहेत. पण त्याचाही त्याच्या मोठेपणामुळेच जिवंतपणी अतोनात छळ झाला. शेवटी तर त्याला सूळावर चढवून आणि हातापायाला खिळे ठोकून मारण्यात आले पण त्याचे प्रयत्न वाया गेले नाही. आज अर्ध्या जगाने त्याचा ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे.
विचारक्षेत्रात सॉक्रेटिस किंवा महात्मा गांधी ह्या फार मोठ्या विभूती होत. त्या मोठ्या होत्या म्हणून त्यांनी आपल्या विचारांनी जगाला बदलून टाकले. एक नवे परिवर्तन दिले. कार्ल मार्क्सही असाच असामान्य विचारवंत होता. त्याने जगाला साम्यवाद दिला. पण यामुळेच सॉक्रेटिसला विष देण्यात आले. महात्मा गांधीला गोळी घालून ठार करण्यात आले. कार्ल मार्क्सला परागंदा व्हावे लागले. पण यापैकी कुणीही प्रयत्न सोडून दिले नाहीत. म्हणून ह्या विभूती व त्यांचे विचार जगमान्य ठरले.
जीवनाचे कोणतेही क्षेत्र असो, त्यात यश मिळवायचे असेल तर प्रयत्न केलेच पाहिजेत. नशिबात असेल तसे घडेल हे म्हणणे म्हणजे दैववाद होय. आपण म्हणू तसे घडवून दाखवू हा प्रयत्नवाद आपण स्वीकारला पाहिजे, दैववादाने माणूस कर्तव्यशून्य बनतो, तर प्रयत्नवादाने कर्तृत्वशाली बनतो.
दाणे पेरलेच नाही तर फळ मिळणार कसे? एखादे वेळी मात्र माणसाच्या प्रयत्नाला यश मिळत नाही हे खरे आहे. पण त्यामुळे प्रयत्न सोडून देणे चूक ठरते. टिळक-भगतसिंगानी स्वराज्यासाठी प्रयत्न केले. त्यांना स्वराज्य मिळवता आले नाही. म्हणून त्यांचे प्रयत्न वाया गेले असे म्हणता येत नाही. पुढे गांधीजींनी स्वराज्य मिळवले याचे कारण त्यांच्या आधी टिळक भगतसिंगांनी केलेले कार्य होय. कोणताही दगड पहिल्या घणाने फुटत नाही पण तो कच्चा होतो. म्हणून नंतरच्या घणांनी फुटतो म्हणून पहिला घण वाया गेला असे म्हणता येत नाही.
प्रयत्न चिकाटीने केले पाहिजेत. फळाची आशा न ठेवता केले पाहिजेत. यश निश्चित येईल. कदाचित उशिरा येईल पण निश्चित येईल. म्हणूनच केल्याने होत आहे कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो आणि ऋद्धि-सिद्धि उद्योगाच्याच घरी पाणी भरतात म्हणून यत्न तो देव जाणावा. संत तुकडोजी महाराजांच्या शब्दात - माणूस बसता, भाग्य झोपते। चालता पुढेच घेई झेप ते प्रयत्नाचेचि रूपांतर होते। भाग्यामाजी निश्चयाने।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा