शाळेचा निरोप घेताना
शाळेचा निरोप घेताना माझे डोळे पाण्याने डबडबले होते. या शाळेनेच मला लिहायला-वाचायला शिकवले होते. या शाळेनेच मला 'माणूस बनव होते. या शाळेमुळे लोक मला सुशिक्षित म्हणणार होते. शाळेने मला काय दिले नाही? तिने माझ्या मनात महात्मा फुल्यांच्या समतेच्या विचारांचे बीजारोपण केले. तिने माझ्या हृदयात टिळक सावरकरांच्या राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. तिने मला एकनाथ मह यांच्यासारखे अंत्यजाचे पोर अंगाखांद्यावर खेळवायला लावले. तिने महात्मा गांधीच्या सत्य अहिंसेचा विचार माझ्या अंतःकरणात फुलवला.
ज्ञानेश्वरांच्या काव्याचा दरवळ मी इथेच घेतला. तुकोबाच्या अभंगाचा आस्वादही मी इथेच घेतला. इथेच मी बालकवींच्या निरागस फुलराणीचे स्मितहास्य अनुभवले आणि इथेच मी केशवसुतांच्या तुतारीचा आवाजही ऐकला. शाळेचा निरोप घेताना मला हे सारे सारे आठवले आणि अंतःकरण भडभडून आले.
आमचे गुरुजी मराठीचे सर म्हणजे जणू चालताबोलता ज्ञानकोशच होता. त्यांची चर्या नव्हती तरी त्यांच्याबद्दल आमच्या मनात नेहमी आदरयुक्त भीती वसत होती. त्यांचे बोलणे हळूवार कोमल व रसाळ असले तरी विचार परखड होते. ते नुसते शिकवत नसत तर विद्यार्थ्यांना घडवत असत. कुणी बेशिस्तीने वागला की त्याला चांगला चोप देत असत. पण तसे करतानाही त्याच्याबद्दलचे त्यांचे आंतरिक प्रेम कधीच कमी होत नसे. वरून काटे पण आत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा