epranali

This is educational blog.

Res

Breaking news

रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२

दिवाळीतील पाच दिवसांचे महत्त्व व माहिती

 दिवाळीतील पाच दिवसांचे महत्त्व व माहिती


 दिवाळीतील ५ दिवसांचे महत्त्व

दिवाळीतील पाच दिवसांची माहिती

   दीपावली हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ दिव्यांच्या ओळी भारतीय कॅलेंडरनुसार हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो हा सण ज्ञानाचा प्रकाश अज्ञानावर अंधकार विजय म्हणून प्रतीत होतो. हो म्हणजे पूर्णतः आणि ज्या म्हणजे पूर्ण तेथून जन्माला आलेला म्हणूनच पूजा म्हणजे पूर्ण तेथून जन्माला आलेली ती पूजा आणि पूजा की याने परिपूर्णता व संस्कृती प्राप्त होते पूजा केल्याने वातावरणात सकारात्मकता वाढविणाऱ्या सूक्ष्म लहरी तयार होतात.


धनत्रयोदशी :
                        दिवाळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी घर व कार्यालयीन परिसराला साफसफाई करून सजविले जाते.
          धन व ऐश्वर्याचे प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीचे दारात रांगोळी व पारंपारिक चिन्हाने सुशोभीत करून स्वागत केले जाते.
      तिचे दीर्घ प्रतिक्षेनंतरचे आगमन दर्शविण्यासाठी घरात कुंकवाने छोटी छोटी पदचिन्हे काढली जातात. रात्रभर दिव्यांची आरास केली जाते. हा दिवस अतिशय शुभ मानला जात असल्याने ह्या दिवशी गृहिणी सोनं व चांदीची भांडी खरेदी करतात.
       भारतात कुठे कुठे पशुपक्ष्यांची ही पूजा केली जाते. हा दिवस धन्वंतरी (आयुर्वेदाची देवता अथवा देवांचे वैद्य) चा जन्मदिन म्हणून ही साजरा केला जातो.
     दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. भगवान बुद्धाने म्हटले आहे, "आपो दीपो भव:", म्हणजे तुम्ही स्वतःच प्रकाश रूप व्हा.
      सगळे वेद व उपनिषद हेच सांगतात, की तुम्ही सारेच प्रकाशमान आहात. तुमच्यापैकी कोणी प्रकाशित झाला आहात तर कोणी अद्याप व्हायचे आहेत.
      पण सर्वांमध्ये प्रकाश देण्याची क्षमता आहे. दिवाळीच्या दिवशी आपण सारे अंधकाराला दूर सारंतो. अंधकार मिटविण्यासाठी केवळ एक तिरीप पुरेशी नाही.
        त्यासाठी पूर्ण समाजाला प्रकाशित व्हावे लागेल. परिवारातील केवळ एक सदस्य प्रसन्न असेल तेवढे पुरेसे नाही, प्रत्येक सदस्याला प्रसन्न चित्त व्हावे लागेल. जर एक सुद्धा नाराज राहील, तर बाकी सगळे प्रसन्न राहू शकत नाही. म्हणून प्रत्येक घराला प्रकाशमान व्हावे लागेल.
     दुसरी गोष्ट आपल्या सर्वांच्या आयुष्यात आचारावी लागेल ते म्हणजे माधुर्य. इतरांना केवळ मिठाई वाटू नका तर सगळ्यांना तो गोडवा वाटा, दिवाळीचा सण आम्हा-तुम्हाला हेच सांगतो की जर कुणाबद्दल मनात काही अढी, ताण असेल तर फटाक्यासारखे त्याला उडवून लावा आणि आयुष्याची परत नव्याने सुरुवात करून उत्सव साजरा करा.


नरक चतुर्दशी :
                           दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी.
      ह्या दिवशी भल्या पहाटे उठून सूर्योदया अगोदरच स्नानादी कार्ये आटोपून तयार होण्याची परंपरा आहे.
    या सणाची एक पुरातन कथा आहे. असूरांचा राजा नरकासुर प्रागज्योती सपूर (नेपाळचा दक्षिण प्रांत) येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर, देवांची माता अदिती तिची सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतली व देव आणि संतांच्या 16000 कन्यांना आपल्या अंत:पुरात कैद ठेवले.
    नरक चतुर्थीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने या दानवाचा वध करून त्या सर्व कन्यांची मुक्तता केली. व अदितीची मूल्यवान कर्ण कुंडल परत प्राप्त केले.
    म्हणून प्रातःस्नानाची ही परंपरा वाईट वृत्तीवर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे.ह्या दिवशी शुभ संकल्प घेण्याची रीत आहे.


लक्ष्मीपूजन :
                        दिवाळीचा तिसरा दिवस, सर्वात महत्त्वाचा, लक्ष्मीपूजन.
  या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणी चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते.
   छोटे छोटे दिव्याणी सारे शहर उजळून टाकले जाते. आणि रात्रीचा गहिरा काळोख हळूहळू दूर सारल्या जातो. लक्ष्मी देवी ह्या दिवशी पृथ्वी तलावावर ब्रह्मण करून भरभराट व समृद्धीचा आशीर्वादाची लूट करते असे मानले जाते. सायंकाळी लक्ष्मीपूजन केल्या जाते, आणि घरी बनविलेल्या मिठाईचे सर्वांना वितरण केले जाते.
        हा अतिशय शुभ दिवस मानल्या जातो, कारण त्या दिवशी बऱ्याच संतांनी व महात्म्यांनी समाधी घेऊन आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता.
दिवाळीच्या ह्या दिवसाबद्दल एका रोचक कथेचा उल्लेख आहे.
    अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात. आणि त्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात, आम्हाला समृद्ध करणारी दिव्यता ही देवी लक्ष्मीचे स्वरूप आहे.
        भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रूपात सुद्धा पुजले जाते.
      ज्याप्रमाणे पांढऱ्या प्रकाशात सप्तरंग अंतर्भूत असतात, त्याप्रमाणे दिव्यतेची वेगवेगळी रूपे असतात. म्हणून आजच्या दिवशी आपण ऋग्वेदातील काही प्राचीन मंत्राद्वारे देवी लक्ष्मीची आराधना करू या आणि त्या द्वारे सकारात्मक लहरी व समृद्धी प्राप्त करूया.
      दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. प्राचीन काळी लोक या दिवशी आपले सारे धन देवासमोर आणून ठेवीत ,
          सामान्यतः आपले धन बँकेत किंवा लॉकरमध्ये सुरक्षित ठेवल्या जाते. पण प्राचीन काळी लोक आपले सारे धन समोर पसरवून ठेवत, आणि समृद्धीचा आनंद घेत होते.
       केवळ सोनं, चांदी हेच धन नव्हे तर आपले ज्ञान हे सुद्धा एक धनच आहे. तर ह्या प्रकारचे उत्सव साजरा केला जात असे. तुम्हाला आपल्या ज्ञानाची नीट जतन करायला हवे व त्याबद्दल समृद्धीची भावना हवी. धनत्रयोदशी हा आयुर्वेदाचा दिवस आहे, कारण आपली जडी-बुटी व त्या वनस्पती सुद्धा एक प्रकारचे धन आहे.        असे म्हणतात की याच दिवशी मानवतेला अमृताची देन मिळाली होती.
       तर आजच्या दिवशी तुम्ही खूप सौभाग्यशाली आहात असे मानावे आणि तृप्तीचा अनुभव घ्यावा.
     जेव्हा आपण स्वतःला खूप भाग्यशाली समजतो तेव्हा आयुष्यात बरेच काही प्राप्त होते. बायबल मध्ये लिहिले आहे की "ज्याच्या जवळ आहे त्यांना अजून दिल्या जाईल आणि ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडून जे काही थोडेफार आहे ते ही हिसकावून घेतल्या जाईल,"
         प्राचीन काळापासून हीच शिकवण आहे की मनात समृद्धीचा वास जागता ठेवावा, समृद्धी आपल्या आतून सुरू होते.मग ती बाहेर अभिव्यक्त होते. तुम्हाला खूप आशीर्वादाचे पाठबळ राहील.


गोवर्धन पूजा (बली प्रतिपदा) :
                 दिवाळीचा चौथा दिवस हा वर्ष प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो.
     ह्या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर अरुढ झाला होता. याच दिवशी श्रीकृष्णांने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टी पासून गोकुळातल्या प्रजेचे रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. अशी सांगता आहे.


भाऊबीज :
                   भाऊ बहिणीतील अतुट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. भाऊ आपल्या बहिणींना त्याच्या प्रेमाखातर सुंदरशी भेटवस्तू देतात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा