epranali

This is educational blog.

Res

Breaking news

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

संत मीराबाई

                संत मीराबाई 



(जन्म १४९९ मृत्यू २ मार्च १५४७ ) ' मीराबाई ही मेवाड या रजपूत राजा रतनसिंह यांची मुलगी हिचा जन्म इ.स १४९९ मध्ये झाला चितोडचा राजा राणा संग याचा वडीलपुत्र भोजराजा याच्याशी मीराबाईचा विवाह झाला मीराबाईचा युध्दात मारला गेला तेव्हापासून मीराबाई एखाद्या तपस्वी योगिनीसारखी राहू लागली बालपणापासून तिची श्रीकृष्णावर भक्ती होती श्रीकृष्ण तिचे अतिशयच प्रेम होते रात्रदिवस ती श्रीकृष्णाच्या चितनात मग्न राहत होती ती सत शिरोमणी गुरु रविदासाची शिष्य होती मीरा के प्रभु गिरीधर नागर, चरणकमल बलहारी रे मीरेचा प्रभू पर्वत उचलून धरणारा भगवान, त्याचे चरणकमल सर्व भय हरण करण्यास समर्थ आहेत. असे मीराबाई | विश्वासाने अनेक पद्यातून सांगते, मीराबाई चारचौघात उघड भजन करीत असे राजघराण्यातील पडदानशीन स्त्रीने असे वागणे तत्कालीन लोकाना | रूचले नाही. तिचा अतिशय छळ झाला. नव्या राजाने म्हणजे तिच्या दिराने आपल्या बहिणीबरोबर उदाबाईबरोबर मीराबाईकडे पेटाच्यातून स पाठवला मीराबाईने तो हसत हसत गळ्यात घातला, त्या सर्पाचा पुष्पहार बनला हे वर्तमान ऐकून नवा राजा चिडला. त्याने उदाबाईबरोबर विषाचा प्याला पाठवला भावाची आज्ञा मान्य करून उदाबाई मीराबाईकडे गेली, "वहिनी, नव्या राजाने तुला विष पाजण्यासाठी पाठविल आहे " |सांगताना उदाबाईचा कठ दाटून आला. 'उदाबाई, मला याचे किमपि दुःख वाटत नाही. मी माझा देह कृष्ण परमात्म्याला अर्पण केला आहे. असं अम म्हणून ती श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर गेली. उदाबाईन दिलेला तो विषाचा प्याला श्रीकृष्णास नैवेद्य दाखवून प्राशन केला मीराबाईला ते विष अमृताप्रमाणे गोड लागले, परंतु श्रीकृष्णाची मूर्ती हिरवीगार दिसू लागली. मीराबाईने श्रीकृष्णाची प्रार्थना केली, हे रूक्मिणीकाता, मी विष प्राशन केल्याने तुझा रंग पालटावा का ? कालिया सर्पाचे अतिभयकर विष तुला बाधले नाही आणि या विषाने तुझ्यावर परिणाम झाला, हे पाहून मला खूप दू ख झाले आहे. तू पूर्ववत होऊन मला लागलेली तळमळ दूर कर. "मीराबाईची प्रार्थना ऐकून ती मूर्ती पूर्ववत झाली. तो मूर्ती लहानपणी तिला एका साधूने दिली होती. मीराबाईचे सद्गुरू महात्मा रैदास, रविदास, रोहिदास या नावाने ओळखले जाणारे संत शिरोमणी संत रविदास होते. नव्या राजाने मीराबाईला काट्याची शेज पाठवली. रात्री मीराबाई झोपायला गेली तर ती फुलासारखी नरम झाली. तिच्या त्या दीराने मीराबाईला मारून टाकण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु श्रीकृष्णाने प्रत्येक वेळी तिचे रक्षण केले. श्रीकृष्णाशिवाय कशातही तिचे मन रमत नव्हते. तिला श्रीकृष्णाशिवाय राहता येत नव्हते. श्रीकृष्णाची भक्ती तिला आनंदमय वाटत होती. सासरच्या लोकांनी दिलेला त्रास मीराबाईने भक्तीच्या जोरावर सहन केला. मीराबाई सासर सोडून | माहेरी आली. श्रीकृष्णाच्या भक्तीसाधनेत रमलेली मीराबाई नंतर वृंदावनात गेली. तिथे तिने साधू संतांच्या सहवासात राहून अनेक भक्तीपर पदे | रचिली साधू सताना तिने ती गाऊन दाखविली तिच्या पद्यरचनेमुळे तिला सतसाधुत्वाचा मान मिळाला. सत सूरदास यांची मीराबाईशी भेट झाली होती. सत तुलसीदास हे तिच्या समकालीन होते. सताच्या चरणी सर्व तीर्थे आहेत त्या चरणाना ती वंदन करीत होती. गिरीधारी श्रीकृष्णाच्या चरणी तिचे ध्यान लागले होते, त्या चरणाचा तिला रात्रंदिवस ध्यास लागला होता श्रीकृष्णप्रेमात वृंदावनी मीराबाई आली होती राजस्थानची कन्या म्हणून ओळखली जाणारी ही प्रख्यात कवयित्री द्वारकेत जाऊन राहिली १५४६ मध्ये तो श्रीकृष्णरूपात मिळून गेली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा