epranali

This is educational blog.

Res

Breaking news

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

मोहरम

                   'मोहरम'



              : महमद पैगंबराला हिरा पर्वतावर साक्षात्कार झाला. तो काळ फारच संकटाचा होता सामान्य जनता सत्ताधाऱ्याच्या जुलमामुळे हैराण झाली होती. हैराण झालेले लोक मनातून देवाचा धावा करीत होते. न्याय व नीतिमत्ता यांना दुष्ट लोकांचे ग्रहण लागले. तेव्हा बालून सामान्य जनांची सुटका करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो, अशी भावना होती. महमद पैगबराला साक्षात्कार झाला. परंतु तो स्वतःला परमेश्वराचा अवतार समजत नव्हता, तर प्रोषित समजत होता. त्याने ईश्वरावादाचा प्रचार केला. हळूहळू हा प्रचार वाढत गेला. विस्कळीत झालेला समाज एकत्र येऊ लागला. महमद पैगंबराला फातमा नावाची मुलगी होती. तिला हसन आणि हुसेन अशी दोन मुले होती. आपआपसातील वैराने प्रगती खुंटते हा विचार यतीज घराण्यातील लोकांना व हसन-हुसेन यांना पटत होता. म्हणून यतीज घराण्याने आपल्याला बोलावले आहे, असे समजून हसन-हुसेन कुफा नावाच्या गावी गेले. यतीज घराणे आपल्यात येत आहे, याचा आनंद दोघाच्या चेहऱ्यावर होता. कथाकथन - परंतु यतीज घराण्याचा हेतू चांगला नव्हता. त्यांना दगाबाजी करून त्या दोघांना मारावयाचे होते. त्यामुळे सात दिवस लढण्यात, मारामारी करण्यात गेले. ही लढाई बगदादमधील करबला मैदानावर झाली. यतीज घराणे मोठे पडल्यामुळे त्यांनी दोघांना पकडून ठेवले व काहीही खायलाप्यायला दिले नाही. आठवा दिवस तसाच गेला, नवव्या दिवशी हसन हुसेन नमाज पढण्यासाठी वाकले. त्याचा फायदा घेऊन, त्यांची हत्या केली. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात नवव्या व दहाव्या दिवशी उपवास केला जातो. तेव्हा पाण्याचा थेंबही प्यायचा नसतो. हा उपवास सकाळी पाच वाजता सुरू होऊन संध्याकाळी सात वाजता संपतो. दहाव्या दिवशी हसन व हुसेन यांची प्रतिकृती बनवून संपतो. दहाव्या दिवशी हसन व हुसेन याची प्रतिकृती बनवून त्यांचे दफन केले जाते. (म्हणजे तलावात या प्रतिकृतीचे विसर्जन केले जाते) नंतर आघोळ वगैरे केली जाते. सात दिवस चालणाऱ्या लढाईत ह्या दोघांना पाणी व जेवणसुध्दा दिले नाही, म्हणून त्या दिवशी सर्वांना सरबत वाटले जाते. गोर-गरिबाना अन्नदान केले जाते यासंबंधी दतकथा अशी सांगितली जाते, की हसन हुसेन आपण शत्रूना दिसू नये म्हणून खड्ड्यात लपत, तेव्हा कोळी त्या खड्ड्यावर जाळे - विणीत. जेणे करून हे दोघे शत्रूच्या नजरेस पडणार नाहीत, परंतु सरडा हा प्राणी मात्र आपली मान हलवून हे येथेच लपले आहे, असे दर्शवी. तेव्हापासून सरड्याची मान सतत हलत असते. उत्तर प्रदेशात प्रतिकृती म्हणून 'ताजिया' बनविण्यात येतो. शिया लोक 'मातम' करतात. कारण या दोघांना मारण्यात आमचा हात नाही, आम्हाला माफ करा, असे म्हणून स्वत च्या शरीरावर इजा करून घेतात. या उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक सामील होतात. बंधुभाव वाढवितात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा