'संत गाडगे महाराज
(जन्म २३ फेब्रुवारी १८७६, मृत्यू २० डिसेंबर १९५६) - कीर्तन व स्वत चे आदर्श आचरण या द्वारे बहुजन समाजातील मागासवर्गीयामधील अधश्रद्धा त्याचप्रमाणे शिक्षणाविषयीची उदासीनता घालविण्यासाठी ज्यांनी आपले सर्व आयुष्य वेचलं त्या संत गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील कोतेगावी झाला. त्यांच मूळ नाव डेबूजी झिंगराजी जाणोरकार व आईचे नाव सखूबाई. पण पुढे जनजागृतीसाठी ते गावोगावी कीर्तने करीत फिरू लागले. त्यावेळी ते अंगात सदैव गोधडीसारखा अंगरखा घालीत व हाती मातीचे गाडगे बाळगीत. म्हणून त्याना 'गोधडेबाबा' तर कुणी 'गाडगेबाबा' या नावाने संबोधत, परीट जातात जन्मलेल्या गाडगेबाबांचे लग्न १८९२ साली कुताबाईंशी झाले पण से संसारात विशेष रमले नाहीत. स्वत ला जरी शिक्षण बिलकूल घेता आले नाही, तरी प्रखर व चिकित्सक असल्यामुळे त्यांना भोवतालचा बहुजन समाज अज्ञान, अधश्रध्दा व व्यसने यात बुडून स्वत च स्वत ला बरबाद करून घेत असल्याचं कळून आलं आणि म्हणून या समाजाच्या उद्धारासाठी त्याच्यात कीर्तनाद्वारे जागृती करण्याचे त्यांनी ठरवले. ते आपल्या काही टाळकऱ्यासमवेत गावोगाव जाऊ लागले आणि देवापुढे बकरे व कोंबडे बळी देणे किंवा त्यांना दारूचे नैवद्य दाखवून मग ती दारू स्वत च घेणे, अस्पृश्यता मानणे, लाच खाणे, कज काढून थाटात लग्न करणे? शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे अशा गोष्टींवर आपल्या वारकरी पध्दतीच्या कीर्तनातून कडक टीका करू लागले. 'दगडाच्या देवा दह्याच्या घागरी । गरिबाच्या घरी ताक नाही।।' किंवा 'असा कसा तुमचा देव । कोंबड्याचा घेतो जीव ।' अशा तऱ्हेचे अधरूढींवर प्रहार करणारे अभंग-चरण गात, मधूनच श्रोत्यांना खोचक प्रश्न विचारून त्याची स्वत च उत्तरे देत तर अधुनमधून 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' असा गजर करीत. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर | गुजरात व कर्नाटकातील भोळ्या लोकांना सन्मार्ग दाखविला. पंढरपूर, देहू, आळंदी अशा तीर्थक्षेत्री त्यांनी यात्रेकरूंना विनामूल्य राहता यावे, यासाठी धनिकाकडून देणग्या मिळवून सर्व सोयींनी सुसज्ज अशा मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या. श्रीमताकडून येणारे पक्वान्नयुक्त जेवण ते गरिबांना देत व व स्वतः आपल्या मातीच्या गाडग्यात कुणा गरिबाकडून चटणी-भाकर मागून ती ते खात आयुष्यभर ते असेच वागले. सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक संस्थाना त्यानी आर्थिक मदत केली. नेहमीप्रमाणे कीर्तन करीत करीत असेच ते आपल्या टाळकऱ्यांसह चालले असता त्यांचे अमरावतीस निधन झाले. ● सुविचार -• देव हा मातीच्या मूर्तीत नसून तो माणसात पाहावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा