epranali

This is educational blog.

Res

Breaking news

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

स्वराज जननी जिजामाता

          सत्य शिव सुंदर जिजाऊ 



      चारशे वर्षांपूर्वी म्हणजे १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हातील सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊ जाधव हिचा जन्म झाला. आईचे नाव म्हाळसाबाई जिजाऊ हे ट्रीपल एम टॉनिक आहे. ते म्हणजे मन मनगट आणि मस्तक' कर्तबगार. माँ जिजाऊचा विवाह शहाजीराजे भोसले पाटील यांच्यासोबत झाला. मुलगी जन्माला आली तरी मुलाप्रमाणे तिचे स्वागत करा असे आज शासनदरबारी सांगण्यात येत आहे. परंतु ४०० वर्षापूर्वी जिजाऊंच्या जन्माचा आनंद व्यक्त करणाऱ्यांसाठी वडील लखुजी जाधव यांनी हत्ती वर बसून साखर वाटली .आई ही  पहिली शाळा असते. तर शाळा ही समाजाची आई असते. गुलाम माता गुलाम मुलांना जन्म देत असते. स्वयंप्रज्ञेची स्वाभिमानी जिजाऊ आई असली तरी ती शिवाजीला जन्म देते. १९ फेब्रुवारी १६३० रोजी एका पराक्रमी व नीतिमान योद्धाचा जन्म झाला. त्याचे नाव शिवाजी शिव म्हणजे चांगले पवित्र, मंगलमय, जेथे शिव म्हणजे पवित्रता व शुद्धया असते. 'सत्य असतं तेथे सुंदरता असते पती शहाजीला कैदेत ठेवल्यावरही आदिलशाहाला किल्ला परत न करणारी जिजाऊ, अफजल खाना ची भेट घेण्यासाठी शिवाजीला पाठविणारी जिजाऊ, पुरंदरच्या वेढ्यातून शिवाजीला सोडविणारी जिजाऊ, सती प्रथेला त्याकाळी विरोध करणारी जिजाऊ, ४०० वर्षापूर्वी स्त्रिया शूद्र व गुलामीचे जीवन जगत असताना मुलाला समोर करून किल्ले लढविणारी लढाऊ बाण्याची जिजाऊ, रयतेचे  कल्याण करणारी, राज्य निर्माण करण्यासाठी तुला जन्माला घातले असे शिवाजींना ठकावून सांगणारी जिजाऊ, अशुभतेचे प्रतीक म्हणून पुण्याच्या भूमीवर नांगर ठेवणाऱ्या आदिलशाहाची भीती न बाळगता जमीन पवित्र असते, ती अशुभ कधीही नसते, असे बजावून तो नांगर हटविणारी जिजाऊ, अशी जिजाऊंची अनेक ऐतहासिक रूपे आहेत. जिजाऊ म्हणजे आदर्श माता, आदर्श पत्नी आणि आदर्श कल्याणकारी राज्यनिर्माती आहे. धर्मग्रंथ व धर्माचे ठेकेदार तेव्हाही होते, आताही आहेत. पण तेव्हा जावक रूढीपरंपरांमुळे व मनुस्मृतीच्या चौफेर जाचामुळे महिलांचे जीवन दुःखीत, कष्टी व गुलामीचे होते, त्या काळात सामाजिक व राजकीय क्षेत्रात जिजाऊंनी जो निर्भीड बाणा दाखविला ती अस्मितेची ललकारी बनली, त्या सद्प्रवृत्तीला भारतीय इतिहासात तोड नाही... समस्त स्त्रियांना माँ जिजाऊंचे जीवन कार्य लक्षात येईल व ती स्वातंत्र्याची प्राणज्योती आहे, हे समजेल तेव्हा खऱ्या अर्थाने समाजत सत्य, शिव, आणि सुंदरतेचा मिलाफ दिसेल. प्रत्येक कुटुंबाला कदाचित वाटत असणार की, शिवाजीसारखा शूर, बीर, कर्तबगार मुलगा जन्माला यावा. परंतु शिवाजी जन्माला यायचा असेल तर नुसते शहाजी होऊन भागत नाही. त्यासाठी लागते एक सर्वागसुंदर पण लढवय्यी जिजाऊ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा