यावर्षी तूर, मूग, उडदासाठी चांगला भाव मिळण्याची शक्यता ! वाचा सविस्तर
: खरिपात कडधान्याची म्हणजेच तूर, उडीद आणि मुगाची लागवड कमी झाली. त्यामुळं किंमत चांगलेच वाढले. पण तुम्ही म्हणालं, आता तर आमच्याकड तूर नाही आहे उडीद नाही. मग या वाढत्या भावाचा आम्हाला काय फायदा? आमच्याकडं माल असतो तेव्हा भाव कमी असतो. आम्ही माल विकला की भाव वाढतो. पण यावर्षी शेतकऱ्यांनाही तूर, मूग आणि उडदाला चांगला भाव मिळू शकतो. मी हे जे काही मी सांगतो त्याला तीन गोष्टीचा आधार आहे. ते म्हणजे इम्पोर्ट वरील मर्यादा, कमी पेरणी आणि दुष्काळ.
पहीला मुद्दा म्हणजे कडधान्याच्या आयातीवर सरकारला मर्यादा आहेत. सरकारचं धोरण तुम्हाला माहीतच आहे. की वाढले भाव की कर आयात. पण सर्वच उत्पदनाच्या बाबतीत असं करता येत नाही. विशेष म्हणजे तूर आणि उडीद. जागतिक बाजारात तूर आणि उडदाचा पुरवठा एवढाही नसतो की त्यातून भारताची गरज भागेल. का नसतो तर तूर आणि उडीद उत्पादन घेणारा आणि वापर करणारा भारतच खुप मोठा देश आहे.
मग आपलच उत्पादन घटलं तर आपली गरजा कोण पूर्ण करणार ? याचा अनुभव आपल्याला मागच्या सहा महिन्यांपासून येतच आहे. सरकारने तूर आणि उडदाची आयात वाढवायला किती मेहनत केली. पण न आयात वाढली नाही भाव कमी झाले नाही यापुढीच्या काळातही असच होऊ शकतं.
दुसरा मुद्दा आहे पेरणीचा. देशातील कडधान्य लागवड जवळपास आठ टक्क्यांनी कमी आहे. यात यावर्षी शेतकऱ्यांनी तुरीची लागवड ५ टक्क्यांनी कमी केली. मागील ऋतुत तुरीसाठी शेतकऱ्यांना हमी भावही मिळाला नाही. त्यामुळं यावर्षी शेतकरी लागवड कमी करतील, असं आधी पासूनच वाटत होतं. उडदाची लागवड सर्वाधिक १४ टक्क्यांनी घटली. तर मुगाचा पेरा ८ टक्क्यांनी घटला. मागील ऋतुत शेतकऱ्यांना मिळालेला कमी दर आणि कमी पाऊस यामुळं पेरणी कमी केल्याचं शेतकरी सांगत आहे.
तिसरा मुद्दा तुम्हाला सांगायची गरजच नाही. याचा अनुभव आपल्याला येतच आहे. सध्या आपल्याकडं पाऊस नाही. 1 महिन्यापासून आपण पावसाची वाट पाहतोय. तसंच देशातील इतर तूर, मूग आणि उडीद उत्पादक राज्यांमध्येही पाऊस नाही. यामुळं खरिपात पेरलेल्या या पिकांचं खुप नुकसान होताना दिसतं.
आपल्याकडं पिकांनी अजूनही जमिनच सोडलेली दिसत नाही. काही भागात तर शेतकऱ्यांनी पीक वखरून टाकलं. त्यामुळं नुकसान मोठं आहे. पावसाचं सांगायचं झालं तर आपल्या राज्यात सरासरीपेक्षा ५६ टक्के कमी पाऊस आहे. तसचं कर्नाटकात ७४ टक्के कमी पाऊस पडला. राजस्थान, गुजरात आणि तेलंगणातही ७० ते ८० % कमी पाऊस आहे. आणि ही राज्ये खरिपात कडधान्य उत्पन्नासाठी महत्वाची आहेत.
म्हणजेच इम्पोर्ट मर्यादा, कमी पेरणी आणि दुष्काळ याचा इफ़ेक्ट काय झाला, तर तूर, हरभरा, मूग आणि उडदाचे भाव चांगलेच वाढले. आज आपल्याकडं तूर, मूग, उडीद किंवा हरभरा नाही. म्हणजेच बाजारातील आवक कमी आहे. परिणामी भावात मोठी तेजी आली. तुम्हाला माहीत आहे की तुरीचे भाव मागच्या पाच महिन्यात जवळपास डबल झाले.
शेतकऱ्यांची तूर बाजारात येत होती तेव्हा सहा हजारांचाही भाव मिळाला नाही. पण आता भावानं काही ठिकाणी बारा हजारांचाही टप्पा गाठला. मुगाचा आणि उडदाचाही भाव काही बाजारांमध्ये दहा हजारांवर पोचला. डाळीचेही भाव वाढत आहेत. तूर, मूग आणि उडदाचे भाव वाढल्यानंतर हरभराही मागगे कसा राहील बरे? हरभऱ्याच्या भावात मागील महिनाभरात क्विंटलमागं 1 हजारांची वाढ झाली. हरभरा आता मोठ्या मार्केटमध्ये सरासरा ६ हजारांवर पोचला. सणावारांच्या काळात सर्वच डाळींच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
आता सप्टेंबर महिन्यात पाऊस पडला तरी उत्पन्न कमी आहेच अंदाज आहे. पण जर सप्टेंबरमध्ये पाऊस कमी राहीला तर रब्बीतील महत्वाच्या हरभऱ्याचेही उत्पन्न कमी होईल. यामुळे ही तूर, हरभरा, मूग आणि उडदाचे भाव चांगलेच वाढतील, हा ही मुद्दा main आहे. कमी पावसामुळं खरिपातील तूर, मूग आणि उडदाचे उत्पादन कमी होणारच आहे. पण हाती आलेल्या या मालाला चांगला भाव मिळाला आणि उत्पादन खर्च भरून निघावा, हीच आपली आशा आहे
No comments:
Post a Comment